AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ चुकीच्या सवयींमुळे येऊ शकते अकाली वृद्धत्व… आजच बदला जीवनशैली

तरूण दिसण्यासाठी लोक विविध उपाय करतात, सर्वांनाच नितळ व चमकदार त्वचा हवी आहे, तरुण दिसण्यासाठी काही जण खास ट्रिटमेंटदेखील घेतात. याशिवाय आपल्या आहारातदेखील अमुलाग्र बदल करतात. परंतु एवढं केल्यावरही पदरी निराशा पडते. याचे खरे कारण तुमच्या काही चुकीच्या सवयींमध्ये दडले आहे.

‘या’ चुकीच्या सवयींमुळे येऊ शकते अकाली वृद्धत्व... आजच बदला जीवनशैली
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Apr 15, 2022 | 3:09 PM
Share

मुंबई : वाढत्या वयातही आपले तारुण्य खुलून दिसावे, आपल्या चेहरा तजेलदार व नितळ असावा, असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाला कायम तरुण (Young) राहायचे असते. दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी विशेषत: महिलांमध्ये खूप चढाओढ असते. यासाठी ते अगदी महागडे उपचार तसेच प्रोडक्टदेखील वापरतात. परंतु आरोग्य तज्ज्ञांच्या (Health Experts) मते, प्रत्येक व्यक्तीला काही वाईट सवयी असतात ज्यामुळे शरीराला हानी पोहोचते. या सवयी केवळ आपल्या आरोग्यासाठीच हानिकारक नसतात तर अकाली वृद्धत्वालादेखील (Premature Aging) आमंत्रित करीत असतात. अशा स्थितीत तुम्ही तरुण वयातच म्हातारे दिसू लागतात, खालील चुकीच्या सवयी तुम्हालाही असतील तर वेळीच त्या बदला.

तणाव

कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त चिंता केल्याने लोक लवकर वृद्ध दिसू लागतात. अशी लोकं कोणत्या ना कोणत्या मानसिक किंवा शारीरिक आजाराला बळी पडू शकतात. अनेकदा ही प्रक्रिया आपल्या लक्षात येत नाही, पण तणाव हा एक अतिशय घातक आणि सायलेंट किलर ठरू शकतो. त्यामुळे दीर्घकाळ तरूण राहायचे असेल तर ताण घेणे टाळले पाहिजे.

पुरेशी झोप न घेणे

दररोज 7 ते 8 तास झोप न घेतल्यानेही अकाली वृध्दत्वाची समस्या निर्माण होउ शकते. पुरेशी झोप न लागण्याचा तणावाशी संबंध आहे. झोप आपल्याला तरुण राहण्यास आणि तणावमुक्त ठेवण्यास मदत करते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. पण काही लोक ते गांभीर्याने घेत नाहीत. तरुणांमध्ये ही समस्या वेगाने वाढत आहे.

शारीरिक हालचाली न होणे

शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसल्यामुळे आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो. व्यायाम न करणे किंवा दैनंदिन जीवनशैलीत शरीर पुरेसे सक्रिय न ठेवणे याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अशा स्थितीत शरीराला लवकर आजार लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपले तारुण्य कमी होते.

योग्य आहार न घेणे

अकाली वृद्धत्वासाठी सकस आहार न घेणे हेदेखील मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. आहारतज्ज्ञ डॉ. अबरार म्हणतात, की 21 व्या शतकात सोडा, प्रक्रिया केलेले अन्न आणि फॅटी फूड यासारख्या गोष्टी आपल्या आहाराचा एक मोठा भाग बनल्या आहेत. या गोष्टी आपल्या आयुर्मानात घट होण्यास जबाबदार आहेत. त्यामुळे सकस आहार घेणे शरीरासाठी व तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्‍यक आहे.

धूम्रपान आणि मद्यपान

तणाव टाळण्यासाठी बरेच लोक दारू, तंबाखू किंवा मादक पदार्थांचे सेवन करू लागतात. यामुळे या सवयींकडे तरुण पिढी अधिक आकर्षित होत आहे. त्यांच्या अतिसेवनाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो, परंतु त्याआधीच त्याचे सतत आणि जास्त सेवन आपल्याला वृद्धत्वाकडे वेगाने घेउन जात असते.

इतर बातम्या

Health Benefits Of Flax Seeds : सुपर फूड अळशी, रोज 1 चमचा अळशी खाल्ल्याने होतील चमत्कारिक फायदे

सावध व्हा! कोरोनाने पुन्हा डोके वर काढले, ‘या’ शहरांमधील मुलं होताय बाधित

गर्भधारणेतील ‘ही’ पाच लक्षणं आहेत अगदी सामान्य…असे होतात शारीरिक बदल

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.