AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Balochistan : आम्हाला फक्त या 3 गोष्टी द्या, पाकिस्तानला संपवतो, बलूचिस्तानची भारताकडे मोठी मागणी

Balochistan : पाकिस्तान आपल्याच लोकांवर अत्याचार, अन्याय करतो. बलूचिस्तान त्याचं उत्तम उदहारण आहे. बलूचिस्तानात पाकिस्तान विरोधात मोठा संताप आहे. बलूच फायटर्सनी पाकिस्तान विरोधात शस्त्र उचलल आहे. दररोज बलूच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात पाकिस्तानी सैनिक ठार होत आहेत.

Balochistan : आम्हाला फक्त या 3 गोष्टी द्या, पाकिस्तानला संपवतो, बलूचिस्तानची भारताकडे मोठी मागणी
BLA vs PAKISTANImage Credit source: TV9 Hindi
| Updated on: May 12, 2025 | 1:06 PM
Share

भारत-पाकिस्तानमध्ये सीजफायर झाल्यानंतर बलूचिस्तानातील फायटर्सनी पाकिस्तान विरोधात मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तान एक ज्वालामुखीवर असलेला देश आहे. आम्ही त्याला नष्ट करु असं बलूच फायटर्सनी म्हटलं आहे. त्यांनी भारताकडे पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी मदत मागितली आहे. भारताकडून आम्हाला फक्त तीन गोष्टी मिळाल्या, तर आम्ही पाकिस्तानला संपवून टाकू असं BLA ने म्हटलय. द बलूचिस्तान पोस्टनुसार, भारत-पाकिस्तानमध्ये सीजफायर झाल्यानंतर बलूच फायटर्सनी एक स्टेटमेंट जारी केलय. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाळतो. त्यांच्यासोबत कूटनीतिक संबंध मूर्खपणा आहे असं बलूच फायटर्सनी सांगितलं. भारताने पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी मदत केली तर आम्ही पाकिस्तानला धडा शिकवू असं बलूच लिबरेशन आर्मीच म्हणणं आहे.

भारताकडून आम्हाला राजकीय, कूटनितीक आणि संरक्षण सहकार्य मिळालं, तर या आतंकिस्तान, पाकिस्तानला पूर्णपणे उद्ध्वस्त करुन टाकू, असं बीएलएने म्हटलय. बलूचिस्तानने जगातील अन्य देशांकडूनही मदत मागितली आहे. वेळेआधी पाकिस्तानला संपवलं नाही, तर ते जगासाठी धोकादायक ठरतील असं बलूच बंडखोरांच म्हणणं आहे. भारताने उद्या पाकिस्तानची तुकड्यांमध्ये विभागणी करण्याचा निर्णय घेतला, तर आम्ही सर्वप्रथम सहकार्य करु. असं बलूच लिबेरशन आर्मीच म्हणणं आहे. बलूच फायटर्सनुसार, या निर्णयानंतर तात्काळ त्यांचे लोक पाकिस्तानच्या पश्चिम सीमेला घेराव टाकतील.

बलूच लिबरेशन आर्मीने काय म्हटलय?

बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान सरकारला अल्टीमेटम दिला आहे. “तो दिवस आता दूर नाही, जेव्हा बलूच एक स्वतंत्र देश बनेल. असं होण्यापासून जगातील कुठलीही शक्ती रोखू शकत नाही” असा बलूच लिबेरशन आर्मीचा दावा आहे. “या कामाला जितका उशीर होईल, तितकाच रक्तपात होईल. आम्ही आमच्या उद्देशापासून मागे हटणार नाही” असं बीएलएने सांगितलय.

प्लान सुद्धा तयार

बलूच लिबरेशन आर्मीनुसार, पाकिस्तान अणवस्त्र सज्जतेच्या आडून दहशतवाद्यांना पाळतो. त्यांना प्रशिक्षण देतो. पाकिस्तानात हे उघडपणे सुरु आहे. पण त्यांना कोणी रोखत नाहीय. पाकिस्तानात फक्त आम्हीच हे संपवू शकतो, असं बीएलएच म्हणणं आहे. त्यासाठी संपूर्ण पाकिस्तान संपवावा लागेल. बीएलएने पाकिस्तानला संपवण्याचा प्लान सुद्धा बनवला आहे.

Follow Us
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या....