AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अत्यंत जवळचा मित्र देश भारतावर प्रचंड नाराज, थेट बोलत म्हटले, दिल्लीकडून…

मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये मोठा तणाव बघायला मिळतोय. अमेरिकेच जगातील अनेक देशांवर मोठा दबाव आहे. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करेल, असे सांगितले जात होते. मात्र, इराणची आक्रमक भूमिका पाहून अमेरिकेने एक पाऊस मागे घेतला.

अत्यंत जवळचा मित्र देश भारतावर प्रचंड नाराज, थेट बोलत म्हटले, दिल्लीकडून...
Chabahar Port
| Updated on: Feb 26, 2026 | 2:02 PM
Share

भारतासाठी इराणचे चाबदार बंदर कायमच महत्वाचे राहिले. 400 कोटींची गुंतवणूक गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात भारताने करण्याचा निर्णय घेतला होता. भारत चाबदार बंदरावर विकास करत होते. पूर्णपणे या बंदरावर भारताचा ताबा होता. मात्र, भारताने धक्कादायक निर्णय घेत यावर्षीच्या अर्थसंकल्पात चाबदार बंदराच्या निधीबाबत कोणतीही घोषणा केली नाही. भारतासाठी चाबदार बंदर फायदेशीर असतानाही भारताने चाबदार बंदरच्या विकासासाठी निधीची घोषणा केली नाही. त्यामागील मोठे कारण असून अमेरिकेचा दबाव आहे. चाबदार बंदर भारताच्या हाती असणे म्हणजे भारताकडे मोठा शॉर्टकट आहे. पण इराण आणि अमेरिकेतील ताणलेल्या संबंधात भारताला हा निर्णय घ्यावा लागला. सध्या चाबदार बंदर भारताच्याच हातात आहे. मात्र, या अर्थसंकल्पात चाबदार बंदराला कोणताही निधी न देण्याचा निर्णय भारताने घेतला. यामुळे इराण भारतावर नाराज आहे.

यावर्षी चाबहार बंदर प्रकल्पासाठी कोणताही निधी न देण्याच्या भारताच्या निर्णयावर इराणने निराशा व्यक्त केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची म्हणाले, निधी रोखण्याचा भारताचा निर्णय तेहरानसाठी आणि दिल्लीसाठी निराशाजनक आहे. भारत आणि इराणचे संबंध कायमच चांगली राहिली. भारतासाठी फायदेशीर असलेले बंदर त्यांनी भारताच्या ताब्यात दिले. पण काही गोष्टींमुळे भारत माघार घेत आहे, त्यावरच इराणने निराशा व्यक्त केली.

एका मुलाखतीमध्ये बोलताना अब्बास अरघची यांनी म्हटले की, हा प्रकल्प मध्य आशिया आणि युरोपशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यात भूमिका बजावते. मला वाटते की इराण आणि भारत दोघांसाठीही निराशाजनक आहे, अर्थसंकल्पात चाबदार बंदरला निधी देण्यात न आलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

नरेंद्र मोदी यांचे नाव घेत त्यांनी पुढे म्हटले की, नरेंद्र मोदी यांनी चाबहारला हिंद महासागर प्रदेशातील मध्य आशिया आणि युरोपशी जोडण्याचा सोण्याचा दरवाजा म्हटले होते. भारतासाठी आजही चाबदार बंदर अत्यंत महत्वाचे आहे. मात्र, सध्याच्या स्थितीला भारत तिथे कोणतेही गुंतवणूक करू शकत नाही, सध्या वातावरणही तसेच असल्याने. भारत पुढची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...