AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारताचा पाकला मोठा झटका, सिंधूचं पाणी मिळणार नाहीच, अधिकृत भूमिका समोर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यानंतर भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे. ही स्थगिती कायम असणार आहे.

मोठी बातमी! भारताचा पाकला मोठा झटका, सिंधूचं पाणी मिळणार नाहीच, अधिकृत भूमिका समोर
indus water treaty
| Updated on: May 13, 2025 | 6:17 PM
Share

Sindhu Water Treaty :  गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले आहेत. सध्या या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने तसेच पाकिस्ताने एकमेकांच्या विरोधात घेतलेले निर्णय कायम आहेत. असे असतानाच आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानबाबतच्या धोरणावर अधिकृत भूमिका सांगितली आहे. सिंधू जलवाटप कराराला देण्यात आलेली स्थगिती कायम राहील, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने नेमकं काय सांगितलंय?

एक चांगली भावना तसेच मैत्रिपूर्ण संबंधाला समोर ठेवून सिंधू जलवाटप करार करण्यात आला होता. गेल्या अनेक दशकांपासून दहशतवादाला खतपाणी घालून पाकिस्तानने मात्र या धारणाले हरताळ फासला आहे. त्यामुळे सीसीएसच्या निर्णयानुसार सीमेपलिकडच्या दहशतवादाला पाकिस्तान जोपर्यंत संपवत नाही, तोपर्यंत सिंधू जलवाटप करार स्थगितच राहील, असं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे.

गोळीचं उत्तर गोळीनंच देऊ

तसेच, पाकच्या गोळीचं उत्तर आम्ही गोळीनंच देऊ. भारताने पाकमधील तळांना टार्गेट केलं. 10 मे रोजी पाकिस्तानचे हवाई तळ उद्ध्वस्त केले. हवाई तळ नेस्तनाबूत झाल्यावर पाक नरमला.  पराभव झाला तरी ढोल वाजवणं ही पाकिस्तानची सवय आहे, असंदेखील भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावलं आहे.

भारताच्या भूमिकेचा नेमका अर्थ काय?

भारताने पाकिस्तानसोबतच्या सिंधू जलवाटप करारावरील स्थगिती कायम राहील अशी भूमिका घेतली आहे. तसेच पाकिस्तान जोपर्यंत त्यांच्या देशात पोसला जाणारा दहशतवाद संपवणार नाही, तोपर्यंत या कराराला स्थगिती कायम राहील असंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. म्हणजेच आता पाकिस्तानला सिंधू जलवाटप कराराअंतर्गत भारतातून जाणाऱ्या नद्यांचं पाणी हवं असेल तर अगोदर या देशाला त्यांच्या भागातील दहशतवादाला संपवावं लागणार आहे. सीमाभागात असलेल्या दहशतवादी तळांना नष्ट करावं लागणार आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने काय निर्णय घेतला होता?

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली होती. भारताने तत्काळ प्रभावाने सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली होती. तसेच भारतात व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर सिंधूचे पाणी रोखल्यास आम्ही त्याला युद्ध छेडण्याची क्रिया समजू अशी पोकळ धमकी पाकिस्ताननं दिली होती. त्यानंतर दोन्ही देशांतील वाद वाढत गेला. भारताने पुढे ऑपरेशन सिंधू राबवून पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.