AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानची भारताविरोधात दुसरी आघाडी, लश्करच्या दहशतवाद्यांनी घेतली बांगलादेशातील अधिकाऱ्यांची भेट

पहलगाम हल्ल्यानंतर लश्कर ए तैयबाच्या एका बड्या नेत्याने कायदेशीर सल्लागार डॉ.आसिफ नजरुल यांची भेट घेतली. त्यामुळे बांगलादेश सरकार कट्टरपथींना प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

पाकिस्तानची भारताविरोधात दुसरी आघाडी, लश्करच्या दहशतवाद्यांनी घेतली बांगलादेशातील अधिकाऱ्यांची भेट
मोहम्मद युनूस शहबाज शरीफ
| Updated on: Apr 26, 2025 | 1:40 PM
Share

बांगलादेशमधील शेख हसीना सरकार गेल्यापासून त्या देशाच्या धोरणात खूप बदल झाला आहे. बांगलादेशमधील मोहम्मद युनूस सरकार कट्टरपंथी लोकांच्या दबावाखाली काम करत आहे. बांगलादेशची वाटचाल पाकिस्तानप्रमाणे होत आहे. पहलगाम हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानचे संबंध कामालीचे तणावपूर्ण बनले आहे. त्याचवेळी पहलगाम हल्ल्यानंतर लश्कर ए तैयबाच्या एका बड्या नेत्याने कायदेशीर सल्लागार डॉ.आसिफ नजरुल यांची भेट घेतली. त्यामुळे बांगलादेश सरकार कट्टरपथींना प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमधील कट्टरपंथी आणि बांगलादेशातील अंतरिम सरकार यांच्यात जवळकी वाढत आहे. डॉ.आसिफ नजरुल आणि लश्कर ए तैयबाचा नेता इजहार या दोघांच्या भेटीसंदर्भात पूर्ण माहिती अजून मिळालेली नाही. इजहार हा लष्कर ए तैयबाचा दशतवादी आहे. तो बांगलादेशच्या भूमीवरुन दहशतवादी कारवायांचा कट आखत होता. त्यानेच 2009 मध्ये ढाकात भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर हल्ला करण्याची योजना तयार केली होती. त्यात त्याला अपयश आले. इजहार यांचे हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेसोबत चांगले संबंध आहे. हिफाजत-ए-इस्लाम एक देवबंदी इस्लामी समूह आहे. बांगलादेशने त्याच्यावर 2010 मध्ये बंदी आणली.

इजहार याच्यावर बांगलादेशमधील सुरक्षा संस्था 2009 पासून लक्ष ठेवून आहे. त्याने डॉ.आसिफ नजरुल यांची भेट घेतल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. हा प्रकार भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणार आहे. सध्या या प्रकाराची चौकशी सुरु आहे. परंतु त्यात सत्य आढळल्यावर भारतासाठी चिंतेची गोष्ट असणार आहे. पाकिस्तान भारताविरोधात दुसरी आघाडी बांगलादेशच्या माध्यमातून उघड नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बांगलादेशात मोहम्मद यूनुस सरकार आल्यावर लश्कर-ए-तैयबाने आपला विस्तार केला. या संघटनेने कट्टरपंथी युवकांना जिहादच्या नावावर एकत्र करणे सुरु केले. लश्कर ए तैयबाच्या बांगलादेशमधील या हालचाली भारतासाठी आव्हान ठरणार आहे. यामुळे पूर्वोत्तर भारतात दहशतवादी कारवायांना वेग येण्याचा धोका आहे. बांगलादेशच्या मार्गाने पूर्वोत्तर भारतात पाकिस्तान शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांचे तस्करी करण्याचा धोका आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.