AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानची भारताविरोधात दुसरी आघाडी, लश्करच्या दहशतवाद्यांनी घेतली बांगलादेशातील अधिकाऱ्यांची भेट

पहलगाम हल्ल्यानंतर लश्कर ए तैयबाच्या एका बड्या नेत्याने कायदेशीर सल्लागार डॉ.आसिफ नजरुल यांची भेट घेतली. त्यामुळे बांगलादेश सरकार कट्टरपथींना प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

पाकिस्तानची भारताविरोधात दुसरी आघाडी, लश्करच्या दहशतवाद्यांनी घेतली बांगलादेशातील अधिकाऱ्यांची भेट
मोहम्मद युनूस शहबाज शरीफ
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 26, 2025 | 1:40 PM
Share

बांगलादेशमधील शेख हसीना सरकार गेल्यापासून त्या देशाच्या धोरणात खूप बदल झाला आहे. बांगलादेशमधील मोहम्मद युनूस सरकार कट्टरपंथी लोकांच्या दबावाखाली काम करत आहे. बांगलादेशची वाटचाल पाकिस्तानप्रमाणे होत आहे. पहलगाम हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानचे संबंध कामालीचे तणावपूर्ण बनले आहे. त्याचवेळी पहलगाम हल्ल्यानंतर लश्कर ए तैयबाच्या एका बड्या नेत्याने कायदेशीर सल्लागार डॉ.आसिफ नजरुल यांची भेट घेतली. त्यामुळे बांगलादेश सरकार कट्टरपथींना प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमधील कट्टरपंथी आणि बांगलादेशातील अंतरिम सरकार यांच्यात जवळकी वाढत आहे. डॉ.आसिफ नजरुल आणि लश्कर ए तैयबाचा नेता इजहार या दोघांच्या भेटीसंदर्भात पूर्ण माहिती अजून मिळालेली नाही. इजहार हा लष्कर ए तैयबाचा दशतवादी आहे. तो बांगलादेशच्या भूमीवरुन दहशतवादी कारवायांचा कट आखत होता. त्यानेच 2009 मध्ये ढाकात भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर हल्ला करण्याची योजना तयार केली होती. त्यात त्याला अपयश आले. इजहार यांचे हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेसोबत चांगले संबंध आहे. हिफाजत-ए-इस्लाम एक देवबंदी इस्लामी समूह आहे. बांगलादेशने त्याच्यावर 2010 मध्ये बंदी आणली.

इजहार याच्यावर बांगलादेशमधील सुरक्षा संस्था 2009 पासून लक्ष ठेवून आहे. त्याने डॉ.आसिफ नजरुल यांची भेट घेतल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. हा प्रकार भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणार आहे. सध्या या प्रकाराची चौकशी सुरु आहे. परंतु त्यात सत्य आढळल्यावर भारतासाठी चिंतेची गोष्ट असणार आहे. पाकिस्तान भारताविरोधात दुसरी आघाडी बांगलादेशच्या माध्यमातून उघड नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बांगलादेशात मोहम्मद यूनुस सरकार आल्यावर लश्कर-ए-तैयबाने आपला विस्तार केला. या संघटनेने कट्टरपंथी युवकांना जिहादच्या नावावर एकत्र करणे सुरु केले. लश्कर ए तैयबाच्या बांगलादेशमधील या हालचाली भारतासाठी आव्हान ठरणार आहे. यामुळे पूर्वोत्तर भारतात दहशतवादी कारवायांना वेग येण्याचा धोका आहे. बांगलादेशच्या मार्गाने पूर्वोत्तर भारतात पाकिस्तान शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांचे तस्करी करण्याचा धोका आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत