AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-नेपाळ सीमेवर मशिदी आणि मदरसे का बांधले जातायेत? तुर्कस्तानचा नेमका प्लॅन काय?

भारत-नेपाळ सीमेवर तुर्कस्तान वेगाने मशिदी आणि मदरशांचे जाळे निर्माण करत आहे. भारताला लागून असलेल्या नेपाळी प्रांतातील मशिदींची संख्या 2018 मध्ये 760 वरून 2021 मध्ये 1000 पर्यंत वाढली आणि याच काळात मदरशांची संख्या 508 वरून 645 झाली.

भारत-नेपाळ सीमेवर मशिदी आणि मदरसे का बांधले जातायेत? तुर्कस्तानचा नेमका प्लॅन काय?
India Nepal borderImage Credit source: PTI
| Edited By: | Updated on: Jul 12, 2025 | 2:49 AM
Share

तुर्कस्तान आता नेपाळमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नेपाळच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये तुर्की आणि पाकिस्तान पुरस्कृत धार्मिक स्थळे आणि नेटवर्कचा विकास भारतासमोर गंभीर आणि गुंतागुंतीची आव्हाने असल्याचे अहवालात म्हटले आहे. विशेषत: प्रादेशिक सुरक्षा, लोकसंख्येतील बदल आणि सीमेपलीकडील कट्टरतावादाची शक्यता यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे.

तुर्कस्तान नेपाळमध्ये काय करत आहे?

नेपाळमध्ये तुर्कस्तानचे अस्तित्व जुने असले तरी सीमाभागातील बांधकामे नक्कीच नवीन आहेत. तुर्कीच्या ‘आयएचएच’ या स्वयंसेवी संस्थेने नेपाळच्या सीमावर्ती भागात आपल्या कारवाया वाढवल्या आहेत. आयएचएच अतिरेकी गटांशी संबंधित आहे आणि तुर्की सरकार आणि गुप्तचर संस्थांकडून पैसे आणि समर्थन देखील मिळत असल्याचे म्हटले जाते. इस्लामिक युनियन नेपाळ सारख्या स्वदेशी गटांशी युती करून, आयएचएचने अल्पसंख्याक मुस्लिम लोकसंख्येसाठी मशिदी, मदरसे, अनाथाश्रम आणि इस्लामी केंद्रांच्या बांधकामास प्रायोजित केले आहे.

तुर्कस्तान नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय नेटवर्क तयार करत आहे नेपाळमध्ये मशिदी आणि मदरसे बांधून तुर्कस्तान एका बाणाने दोन लक्ष्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. पहिली गोष्ट म्हणजे नेपाळमध्ये वैचारिक प्रवेशासाठी मानवतावादी प्रवेश निर्माण करणे आणि राजकीय किंवा सामरिक हेतूंसाठी वापरता येईल असे आंतरराष्ट्रीय जाळे तयार करणे. तुर्की पुरस्कृत धार्मिक संस्थांवर विशिष्ट प्रकारच्या राजकीय इस्लामचा प्रसार केल्याचा आणि कट्टरपंथी अजेंडा वाहून नेणाऱ्या गटांना रसद पुरविल्याचा आरोप आहे. त्यांना तुर्कस्तानची सरकारी एजन्सी टीकेए आणि इंटेलिजन्स एजन्सी यांचे पाठबळ आहे.

भारतासाठी काय अडचणी आहेत?

नेपाळ सीमेवर तुर्कस्तानसमर्थक घटकांचा उदय भारतासाठी अडचणीचा ठरू शकतो. यामुळे सीमेवरील लोकांमध्ये वैचारिक कट्टरतावाद निर्माण होऊ शकतो आणि भारतविरोधी प्रचाराचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. अतिरेकी अजेंड्यांसाठीही याचा वापर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारत-नेपाळ सीमेवर विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालच्या सीमेवरील प्रांतांमध्ये मशिदी आणि मदरशांच्या वेगाने प्रसारासाठी पाकिस्तान आपली गुप्तचर संस्था आयएसआयच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

भारत-नेपाळ सीमेवर मशिदी आणि मदरशांची संख्या वाढली

गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताला लागून असलेल्या नेपाळी प्रांतातील मशिदींची संख्या 2018 मध्ये 760 वरून 2021 मध्ये 1000 पर्यंत वाढली आणि याच काळात मदरशांची संख्या 508 वरून 645 झाली. या संस्था केवळ धार्मिक संस्था नाहीत, तर भारतविरोधी भावना भडकावण्याचा आणि सीमावर्ती भागात कार्यरत गुन्हेगार आणि अतिरेकी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा ही आरोप आहे.

भारत-नेपाळ सीमा संवेदनशील का आहे?

खुल्या भारत-नेपाळ सीमेवर- ज्याचा बराचसा भाग कुंपण नसलेल्या आणि खडतर प्रदेशातून जातो- लोक, पैसा आणि अगदी बेकायदेशीर वस्तूंची ये-जा सुलभ करते. या मोकळेपणामुळे पाकिस्तान पुरस्कृत गटांना नेपाळचा वापर भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्यासाठी आधार म्हणून करता आला आहे. इंडियन मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांना आर्थिक आणि लष्करी मदत नेपाळसीमेवरून पाठवल्याचे पुरावे आहेत.

Follow Us
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...