AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharkiv : रेल्वे, बस, जे मिळेल त्या वाहनानं किंवा पायी खारकीव सोडा, भारतीय दुतावासाचं तातडीचं आवाहन

भारत सरकारनं आता खारकीव मधील भारतीयांसाठी दुसऱ्यांदा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. खारकीवमध्ये राहणाऱ्या भारतीयांना तातडीनं ते शहर सोडावं, असं सांगण्यात आलं आहे.

Kharkiv : रेल्वे, बस, जे मिळेल त्या वाहनानं किंवा पायी खारकीव सोडा, भारतीय दुतावासाचं तातडीचं आवाहन
खारकीव सोडण्याचं भारतीयांना आवाहन Image Credit source: Tv9 Marathi Creative
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Mar 02, 2022 | 7:24 PM
Share

नवी दिल्ली: रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरु झालंय त्याला सात दिवस होत आले आहेत. भारत सरकारनं आता खारकीव मधील भारतीयांसाठी दुसऱ्यांदा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. खारकीवमध्ये राहणाऱ्या भारतीयांना तातडीनं ते शहर सोडावं, असं सांगण्यात आलं आहे. खारकीवमधील धोकादायक स्थिती लक्षात घेता नागरिकांनी रेल्वे, बसेस द्वारे शहर सोडावं, कोणतेही वाहन उपल्बध न झाल्यास भारतीयांनी पायी चालत शहर सोडावं, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे.

यूक्रेनधील भारतीय दुतावासानं खारकीव मध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आज दुसरी अॅडव्हायजरी जारी केली आहे. खारकीव मधील भारतीय नागरिकांनी सुरक्षेसाठी तातडींन शहर सोडावं. खारकीवमधील स्थिती खराब होत असल्यानं भारतीयांनी पेसोच्यान,बाबाई, बेजल्युदिवाका, या शहरांमध्ये आश्रय घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

खारकीव मधील भारतीयांना रेल्वे , बसेस आणि मिळेल त्या वाहनाने शहर सोडण्यास सांगण्यात आलं आहे. एखाद्या व्यक्तीला वाहन उपलब्ध न झाल्यास त्यानं पायी शहर सोडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी भारतीय दुतावासानं खारकीवमधील भारतीयांना तातडीनं शहर सोडण्याचे आदेश दिले होते. रशियानं खारकीववर हल्ला करण्यापूर्वी भारताला कळवलं होतं. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

रशिया कीव आणि खारकीव मोठा हल्ला करण्याची शक्यता

रशियानं यूक्रेनवर आक्रमण केलंय त्याला आता 7 दिवस पूर्ण होत आलेले आहेत. कीव हे राजधानीचं शहर अद्याप रशियाच्या पूर्णपणे ताब्यात आलेलं नाही. कीव अद्यापही ताब्यात येत नसल्यानं रशिया अस्वस्थ आहे. रशिया आज कीव शहरावर मोठ्या प्रमाणात हल्ला करु शकतं. याशिवाय खारकीव शहरावरही रशियाला कब्जा मिळवायचा असल्यानं खारकीवमध्ये मोठे हल्ले रशियन फौजांकडून केला जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

Russia Ukraine War : भारताला मिळणाऱ्या शक्तीशाली ब्रम्हास्त्राला अमेरिकेचा खोडा? कसं आहे s-400 मिसाईल?

अमेरिका संधीसाधू, रशियाच खरा मित्र… #IStandWithPutin ट्विटरवर ट्रेंड, Memes viral

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली