AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्यावाचून पाक तडफडत असताना,सिंधु करारात चीनने नाक खुपसले, ड्रॅगनची मोठी चाल ?

सिंधू पाणी करारांतर्गत पाकला भारताकडून तीन प्रमुख नद्यांचे पाणी मिळते. पण पहलगाम हल्ल्यानंतर हा करारच रद्द केल्याने या पाणी पुरवठ्यावर थेट परिणाम होऊ शकतो त्यामुळे पाकिस्तान निराशेने पछाडला आहे.

पाण्यावाचून पाक तडफडत असताना,सिंधु करारात चीनने नाक खुपसले, ड्रॅगनची मोठी चाल ?
narendra modi and xi jinping
| Updated on: Jul 16, 2025 | 6:09 PM
Share

जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २४ निरपराध नागरिकांची निर्घृण हत्या झाली. त्यानंतर भारताने १९६० पासून चालु असलेला सिंधू जल वाटप करार रद्द केला.भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवले. त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानच्या सीमेत शिरुन ९ अतिरेकी स्थळांना उद्धवस्थ केले.या सिंधू करारांतर्गत पाकिस्तानला तीन नद्यांचे पाणी मिळत होते. आता हा करारच रद्द झाल्याने पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

सिंधु जल करारात हस्तक्षेप करु शकतो चीन

या दरम्यान आता चीनने देखील या मुद्द्यात नाक खुपसले आहे. कन्व्हरसेशनच्या एका बातमीनुसार चीन सिंधु जल वाटप करारात हस्तक्षेप करु शकतो. त्यामुळे या भागातील तणावात आणखी वाढ होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. भारताला भीती आहे की चीन त्याच्या सीमेतून भारतात वाहणाऱ्या नद्यांचा प्रवाहात अडथळा आणू शकतो. चीनी माध्यमांनी भारताला आक्रमक म्हणत पाण्याला हत्यार म्हणून वापर करण्याची शंका व्यक्त केली आहे. तसेच चीनने अशीही घोषणा केली आहे की तो सिंधूच्या सहायक नद्यांवर मोहम्मद डॅम प्रकल्पांना चालना देणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला फायदा होईल आणि भारतावरील रणनितीक दबाव वाढू शकतो.

भारतातील अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सिंधु जल वाटप कराराच्या अटी पाकिस्तानासाठी जास्तच उदारता दाखवत आहेत. सुमारे ६५ टक्के पाकिस्तानी लोकसंख्या सिंधु नदीच्या खोऱ्यात रहाते. तर भारताच्या बाजूला ही संख्या १४ टक्के आहे. त्यामुळे भारताच्या कठोर निर्णयाने पाकिस्तानला जास्त दु:ख झाले असून तो अडचणीत सापडला आहे.

पाकिस्तानच्या मदतीला धावला चीन

चीन आता स्वत:ला सिंधु जल वाटप करारातील एक महत्वाचा पक्षकार मानू लागला आहे. चीनी माध्यमांनी या प्रकरणात भारताला आक्रमक म्हणत जर पाण्याचा हत्यार म्हणून वापर केला तर याचे गंभीर परिणाम होतील असे चीनने म्हटले आहे. बातम्यांनुसार सिंधुनदीचा उगम क्षेत्र चीनच्या पश्चिमी तिबेट क्षेत्रात आहे. त्यामुळे हा वाद आणखीन संवेदनशील झाला आहे. याच सोबत चीनने घोषणा केली आहे की तो सिंधुच्या उपनद्यांवर मोहम्मंद हायड्रो प्रोजेक्ट वेगाने उभारणार आहे. हे पाऊल भारतासाठी एक मोठा इशारा म्हटले जात आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा