AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वातावरणातील बदलाशी लढणारे मुख्य तापमान अधिकारी, कसे देतात अडचणींवर मात

हवामानातील बदलाचा मनुष्यावर वाईट परिणाम होत आहे. मुख्य तापमान अधिकारी हवामानाचा परिणाम कमी होण्यासाठी काम करत आहेत. मुख्य तापमान अधिकाऱ्यांचं काम काय ते पाहुयात.

वातावरणातील बदलाशी लढणारे मुख्य तापमान अधिकारी, कसे देतात अडचणींवर मात
| Updated on: Jul 30, 2023 | 9:29 PM
Share

नवी दिल्ली : जागतिक तापमानवाढीचा काळ आला आहे. जग गर्मीमुळे त्रासली आहे. पृथ्वीवरील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. हे प्रकरण फक्त काही देशांपर्यंत मर्यादित नाही. संपूर्ण जग याच्याशी लढत आहे. शास्त्रज्ञांनी जुलै हा एक लाख २० हजार वर्षांपासूनचा सर्वात जास्त उष्ण महिना असल्याचं सांगितलं. अमेरिकेपासून युरोप, आशिया आणि आफ्रिका हे देश वाढत्या उष्णतेमुळे चिंतेत आहेत. या बदलत्या हवामानाशी लढण्यासाठी मुख्य तापमान अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येत आहे. अशी माहिती संयुक्त राष्ट्राचे प्रमुख एंटोनियो गुटेरेस यांनी दिली.

हवामानातील बदलाचा मनुष्यावर वाईट परिणाम होत आहे. मुख्य तापमान अधिकारी हवामानाचा परिणाम कमी होण्यासाठी काम करत आहेत. मुख्य तापमान अधिकाऱ्यांचं काम काय ते पाहुयात.

कसे काम करतात मुख्य तापमान अधिकारी?

सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्या कमी करण्यासाठी मुख्य तापमान अधिकारी काम करतात. अमेरिकेत तीन मुख्य तापमान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. वर्ल्ड इकानॉमिक फोरमच्या रिपोर्टनुसार, वाढत्या तापमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे काम करतात. वाढत्या तापमानामुळे धोका वाढत आहे.

वाढत्या जागतिक तापमान वाढीशी लढण्यासाठी मुख्य तापमान अधिकाऱ्याची संकल्पना अमेरिकेचे एड्रीन आर्श रॉकफेलर फाउंडेशन रिसायलंस सेंटरने सुरू केली. २०३० पर्यंत हवामानातील बदलावर हे उपाय सूचवतील. सूर्याच्या थेट किरणांपासून बाधित होणाऱ्या लोकांसाठी हे काम करणार आहेत. हवामान बदलाचा परिणाम आता मनुष्य, प्राणी आणि समुद्रातील जिवांवर दिसणे सुरू झाले आहे.

अमेरिकेत ८ अधिकाऱ्यांची नियुक्ती

गेल्या तीन वर्षांत अमेरिकेने ८ मुख्य तापमान अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. मियामी, लॉस एंडलीस, फोनिक्स यांचा समावेश आहे. पहिली नियुक्ती एप्रिल २०२१ मध्ये मियामीमध्ये झाली. मियामीमध्ये होते जेन गिलबर्ट. जेन गिलबर्ट हे पर्यावरण विशेषज्ञ होते. यांच्या नियुक्तीमागील उद्देश हा उष्णता नियंत्रित करणे आहे. वाढत्या उष्णतेमुळे होणारे मृत्यू थांबवणे आहे. याशिवाय मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेशातही मुख्य तापमान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उष्णतेचा सामना कसा करतात?

अरीजोनाच्या फोनिक्समध्ये ४३ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले. तेथील मुख्य तापमान अधिकारी (सीएचओ)डेवीड होन्डुला म्हणाले, मी फोनचा वापर करत होतो. लोकांना मॅसेजेस पाठवत होतो.

सीएचओची टीम लोकांना वाढत्या तापमानाबद्दल इशारा देते. वृक्षारोपण कार्यक्रम चालवतात. जेणेकरून उष्णतेच्या लाटांपासून बचाव करता येईल. २०५३ पर्यंत अमेरिकेतील मियामी भागात हवामान बदलाचा सर्वात जास्त धोका राहू शकतो. त्यामुळे आतापासून उपाययोजना सुरू झाल्या आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.