AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Currency Note : तुम्हाला काय वाटलं कागदापासून तयार होते भारतीय नोट?

Indian Currency Note : भारतीय नोटा कागदापासून तयार होतात हा मोठा भ्रम आपल्याला आहे. काही तज्ज्ञांनाच माहिती आहे की भारतीय नोटा या कागदापासून नव्हे तर या वस्तूपासून तयार होतात. काय आहे ही वस्तू?

Indian Currency Note : तुम्हाला काय वाटलं कागदापासून तयार होते भारतीय नोट?
| Updated on: Feb 26, 2023 | 7:31 PM
Share

नवी दिल्ली : भारत वेगाने डिजिटलायझेशनकडे वळत आहे. या मार्गावर भारताने क्रांतीकारी झेप घेतली आहे. युपीआय व्यवहारांच्या (UPI Transaction) माध्यमातून भारताने जगात आघाडी घेतली आहे. पण तरीही अनेक ठिकाणी आजही रोखीतूनच व्यवहार करण्यात येतो. आजही अनेक लोकांना असा समज आहे की, भारतीय नोटा (Currency Note)या कागदापासून तयार करण्यात येतात. परंतु, हा मोठा भ्रम आहे. भारतीय नोटा कागदापासून तयार करण्यात येत नाही. सध्या 10, 20, 50, 100, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा चलनात आहे. या नोटा तयार करण्यासाठी कागदाचा उपयोग होत नाही. जर नोटा कागदापासून तयार करण्यात आल्या असत्या तर त्या पाण्याने लवकर खराब झाल्या असत्या. नोटांचे आयुष्य जास्त रहावे यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कागदापासून नोटा तयार करत नाही.

आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर याविषयीची माहिती उपलब्ध आहे. त्यामध्ये नोटा तयार करण्याविषयीची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार नोटा तयार करण्यासाठी कागदाचा नाही तर कपासाचा उपयोग करण्यात येतो. कागदापेक्षा कापसाचे आयुष्य अधिक असते. त्यामुळे या नोटा दीर्घकाळ टिकतात. नोटा तयार करण्यासाठी कापसाचा 100 टक्के वापर करतात. कापसापासून तयार नोट कागदापेक्षा अधिक मजबूत असतात.

इतर देशात कोणत्या वस्तूचा वापर होतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. युरोपियन देशात आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. तरीही अनेक देशात आजही कापसाचाच वापर नोटा तयार करण्यासाठी करण्यात येतो. त्यामुळे कागदापेक्षा कापसाचा वापर नोटा तयार करण्यासाठी होतो, हे लक्षात ठेवा. कागदापासून नोट तयार होते, हा भ्रम आज डोक्यातून काढून टाका.

कापसात लेनिन नावाचे फायबर असते. त्याचा वापर नोटा तयार करण्यासाठी करण्यात येतो. कापसाच्या धाग्यांमध्ये लेनिन असते. त्यामध्ये गॅटलिन आणि Adhesive Solution एकत्रित करण्यात येते. त्यामुळे नोटा लवकर खराब होत नाही. या नोटा दीर्घकाळ टिकतात. नोटा तयार करताना त्याच्या सिक्युरिटी फिचर्सवर खास लक्ष देण्यात येते. त्यामुळे किती बनावट नोटा बाजारात आल्यातरी त्या चटकन आणि पटकन पकडल्या जातात. या नोटा तयार करणारे गजाआड होतात. सिक्युरिटी फिचर्समुळेच खरी आणि बनावट नोट यातील तफावत समोर येते.

RBI ने कोणतीही नोट ओळखण्यासाठी एकूण 17 ओळख पटविणारी चिन्हे सांगितली आहेत. त्यानुसार, या चिन्हांमुळे खऱ्या आणि खोट्या नोटेत फरक ओळखता येतो. त्यामुळे 500 रुपयांच्या नोटेसंबंधी कोणती चिन्ह महत्वाची आहेत ते लक्षात घेऊयात.

दिव्यासमोर नोट धरल्यास त्यावर 500 लिहिलेले आढळेल. महात्मा गांधीचे छायाचित्र मध्यवर्ती असते. भारत आणि इंडिया अशी नावे कोरलेली असतात. नोट मोडल्यावर त्यावर सुरक्षेचा थ्रेड रंगात दिसून येतो. हिरव्या रंगातून निळ्या रंगात बदलविता येतो.

गव्हर्नरची स्वाक्षरी, गॅरंटी क्लॉज, प्रोमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो नोटेच्या दोन्ही बाजूने चिन्हाकिंत असतो. महात्मा गांधींचा फोटो आणि इलेक्ट्रोटाईप वॉटरमार्क दिसून येतो. डाव्या बाजूचे आणि खाली उजव्या बाजूचे क्रमांक डावीकडून उजवीकडे मोठे होत जातात.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?