AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EVM मशीन ठेवलेल्या रुमची चावी कोणाकडे असते? कोणाकडे असते सुरक्षेची जबाबदारी

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये उमदेवारांचे भवितव्य कैद झाले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, या ईव्हीएम मशीन कोणाच्या सुरक्षेत ठेवल्या जातात. मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुमची चावी कोणाकडे असते?

EVM मशीन ठेवलेल्या रुमची चावी कोणाकडे असते? कोणाकडे असते सुरक्षेची जबाबदारी
| Updated on: Nov 21, 2024 | 9:44 PM
Share

देशात निवडणुकीनंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्सचे संरक्षण कसे केले जाते हे अनेकांना माहित नसेल. मतदानानंतर ईव्हीएम मशीन हे सील करून स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या जातात आणि मतमोजणी होईपर्यंत ते तिथेच सुरक्षित असतात. मतदान केंद्रांवरून ईव्हीएम थेट स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या जातात का? तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, मतदान संपल्यानंतर लगेचच मतदान केंद्रातून ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये पाठवले जात नाहीत.

मतदान संपल्यानंतर काय होते?

मतदान संपल्यानंतर निवडणूक अधिकारी ईव्हीएममधील मतांची नोंद तपासतात. मतदारांची संख्या आणि मतं याची संख्या जुळल्यानंतर मशीन सील केले जातात. या दरम्यान, सर्व उमेदवारांच्या पोलिंग एजंटला एक सत्यापित प्रत दिली जाते. जेव्हा सर्व ईव्हीएम येतात. त्यानंतर त्या स्ट्राँग रूममध्ये सील केले जातात. उमेदवारांचे प्रतिनिधीही यावेळी ती सील तपासतात आणि त्यावर सही करतात.

स्ट्राँग रुम पर्यंत कोणीही जाऊ शकत नाही. निवडणूक आयोग त्याच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सतर्क असते. निवडणूक आयोग तीन पातळ्यांवर स्ट्राँग रूमचे संरक्षण करतो. यासाठी निवडणूक आयोग आधीच तयारी करतो.

स्ट्राँग रूमची अंतर्गत सुरक्षा केंद्रीय निमलष्करी दलाकडे असते. याच्या आत आणखी एक सुरक्षा आहे, जी स्ट्राँग रूमच्या आत असते. जी केंद्रीय बलाद्वारे केले जाते. सर्वात बाहेरील सुरक्षा ही राज्य पोलीस दलांची जबाबदारी असते.

EVM जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी

जिल्ह्यात उपलब्ध सर्व ईव्हीएम जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO)च्या देखरेखीखाली असतात. ज्यामध्ये डबल लॉक सिस्टम आहे. त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस दल तिथे तैनात असते. यासोबतच सीसीटीव्हीनेही पाळत ठेवण्यात येते.

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले असून आता २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. मतदारांचा कौल कोणाच्या बाजुने लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणूक निकालानंतर अनेक एक्झिट पोल समोर आले आहेत. ज्यामध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येण्याचे संकेत मिळत आहे. पण खरा निकाला हा शनिवारीच जाहीर होणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.