AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हृदयविकाराचा झटका सर्वाधिक हिवाळ्यात का येतो? जाणून घ्या काय म्हणाले तज्ज्ञ?

हिवाळ्यात तापमान कमी होण्यास सुरुवात होते, असे मेयो क्लिनिकचे तज्ज्ञ सांगतात. शरीर थंड होऊ लागते. हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात. या संकुचित रक्तवाहिन्यांमधून रक्त बाहेर येण्यासाठी अधिक दाब द्यावा लागतो. अशा प्रकारे रुग्णाचा रक्तदाब वाढतो.

हृदयविकाराचा झटका सर्वाधिक हिवाळ्यात का येतो? जाणून घ्या काय म्हणाले तज्ज्ञ?
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Nov 16, 2021 | 6:13 PM
Share

नवी दिल्ली : हिवाळ्यात हृदयावरील दाब वाढतो. दरवर्षी, हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जातात. या ऋतूमध्ये डॉक्टर आपल्या रुग्णांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देतात. युरोपियन जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका 30 टक्क्यांपर्यंत जास्त असतो.

सर्वाधिक अॅटॅक हिवाळ्यात का येतात?

हिवाळ्यात तापमान कमी होण्यास सुरुवात होते, असे मेयो क्लिनिकचे तज्ज्ञ सांगतात. शरीर थंड होऊ लागते. हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात. या संकुचित रक्तवाहिन्यांमधून रक्त बाहेर येण्यासाठी अधिक दाब द्यावा लागतो. अशा प्रकारे रुग्णाचा रक्तदाब वाढतो. रक्तदाब वाढला की हृदयविकाराच्या झटक्याची प्रकरणे घडतात.

तज्ज्ञ सांगतात, थंडीच्या मोसमात रक्त घट्ट होऊ लागते. परिणामी, गुठळ्या सहजपणे तयार होऊ लागतात. या गुठळ्या रक्ताभिसरणात अडथळा निर्माण करतात. परिणामी, रुग्णांना स्ट्रोकचा सामना करावा लागतो.

कोणती लक्षणे दिसल्यावर सतर्क रहावे?

जर तुम्हाला छातीत जळजळ जाणवत असेल, एक विशेष प्रकारचा दाब आणि वेदना होत असतील, तर सावध राहण्याची गरज आहे. याशिवाय पाय सुजणे, जबड्यात दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा वेळी जास्त पाणी पिणे टाळावे. जर तुम्ही आधीच हार्टचे रुग्ण असाल तर डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पूर्णपणे पालन करा.

तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवा

सकाळी लवकर चालणे टाळा

हिवाळ्यात सकाळी लवकर फिरायला जाणे टाळा. विशेषत: जे आधीच हृदयविकाराशी झुंज देत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हिवाळ्यात शिरा आधीच संकुचित होतात. अशा परिस्थितीत, सकाळी 6 किंवा 7 वाजता चालणे त्यांच्यावर वाईट परिणाम करू शकते. त्यामुळे सूर्योदयानंतरच चालणे किंवा 9 वाजल्यानंतरच निघणे चांगले.

जेवणातून मिठाचे प्रमाण कमी करा

अन्नातील मीठाचे प्रमाण कमी करा. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासोबतच शरीरात अतिरिक्त पाणी साठणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर हृदयाला आपले काम करण्यासाठी कमी कष्ट करावे लागतील. त्यामुळेच हृदयरोग्यांनी सकाळी लवकर जास्त पाणी पिऊ नये, असे सांगितले जाते. थंड वातावरणात अजिबात नाही.

उन्हात वेळ घालवा आणि व्यायामही करा

हिवाळ्यातील सूर्यप्रकाश अनेक बाबतीत उत्तम मानला जातो. यूएस हेल्थ एजन्सी, सीडीसीच्या म्हणण्यानुसार, सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन-डी मिळण्यासोबतच शरीर मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज देखील बनवते. त्यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमताही वाढते. (Why do heart attacks occur most in winter, Know what the experts said)

इतर बातम्या

सौरभ कृपाल पहिले समलैंगिक जज होणार?; पण, LGBTQIA+ म्हणजे काय रे भाऊ?

Skin care Routine : निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी ‘हे’ स्किनकेअर रूटीन फाॅलो करा!

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?