Video : अभिनंदन वर्धमान यांचा ‘वीर चक्र’ पुरस्काराने सन्मान, राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो राहिलेल्या अभिनंदन वर्धमान यांना आज वीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्रने सन्मानित केलं. अभिनंदन वर्धमान यांनी 27 फेब्रुवारी 2019 ला एक पाकिस्तानी F-16 लढावू विमान पाडलं होतं.

Video : अभिनंदन वर्धमान यांचा 'वीर चक्र' पुरस्काराने सन्मान, राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
अभिनंदन वर्धमान यांचा वीर चक्र पुरस्काराने सन्मान
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 1:41 PM

नवी दिल्ली : बालाकोट एअर स्ट्राईकचे हिरो राहिलेल्या अभिनंदन वर्धमान यांना आज वीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्रने सन्मानित केलं. अभिनंदन वर्धमान यांनी 27 फेब्रुवारी 2019 ला एक पाकिस्तानी F-16 लढावू विमान पाडलं होतं. त्यानंतर ते तीन दिवस पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरुन भारताने पाकिस्तानवर दबाव निर्माण केला. त्यानंतर पाकिस्तानने अभिनंदन यांना भारताकडे सोपवलं होतं. त्यानंतर अभिनंदन यांच्या शौर्याचा सन्मान करत भारतीय वायूसेनेनं त्यांना ग्रुप कॅप्टनची रँक दिली होती. हे पद भारतीय लष्करात कर्नल रँकच्या बरोबरीचं आहे. (Abhinandan Vardhman honored with Veer Chakra Award by President Ramnath Kovind)

14 फेब्रुवारी 2019 रोयी पुलवामात सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये शहीद झालेल्या 40 जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भारताने 26-27 फेब्रुवारीच्या रात्री पाकिस्तानात एअर स्ट्राईक केलं होतं. बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक दरम्यान अनेक दहशतवादी मारले गेले होते. भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्टाईकला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडूनही भारतीय बॉर्डरवर आपलं विमान पाठवले होते. मात्र, अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं होतं.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं होतं. यावेळी अभिनंदन यांच्या विमानालाही अपघात झाला आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन पडलं. त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्यानं अभिनंदन यांना ताब्यात घेतलं. होतं. मात्र, भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरुन पाकिस्तानवर मोठा दबाव निर्माण केला. त्यामुळे तीन दिवस पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात राहिलेल्या अभिनंदन यांना भारताकडे सोपवणं पाकिस्तानला भाग पडलं होतं.

इतर बातम्या : 

Big News : परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टांचं अटकेपासून संरक्षण, भारतात असून मुंबई पोलिसांच्या दहशतीमुळं समोर येत नसल्याचा दावा 

विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं, चंद्रकांतदादांना विश्वास; अमल महाडिकांच्या विजयाचाही दावा

Abhinandan Vardhman honored with Veer Chakra Award by President Ramnath Kovind

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.