शेतीच्या नुकसानीचे पंचनामे 6 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा, मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
6 नोव्हेंबरपर्यंत मिशन मोडमध्ये पंचनाम्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी (agricultural damage details reports) दिले आहे.
मुंबई : अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या कामांना गती (agricultural damage details reports) द्यावी. तसेच 6 नोव्हेंबरपर्यंत मिशन मोडमध्ये पंचनाम्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी (agricultural damage details reports) दिले आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी जिल्हानिहाय कृषीक्षेत्राचे किती नुकसान झाले याची माहिती घेतली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचनाम्याच्या कामांना गती देतानाच ते अचूक होतील याकडेही लक्ष द्यावे, अशी सूचना मुख्य सचिवांनी केली आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने 10 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याच्या वाटपासाठी पंचनामे वेळेत होणे आवश्यक असल्याचे मुख्य सचिवांनी यावेळी (agricultural damage details reports) म्हटले.
सर्व पंचनामे येत्या 6 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. अगदीच अपवादात्मक परिस्थिती आल्यास 8 नोव्हेंबरपर्यंत ते पूर्ण झाले पाहिजे. पंचनामे करताना तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आणि ज्या ठिकाणी कृषी विद्यापीठे आहेत तेथील कर्मचाऱ्यांचीही त्यासाठी मदत घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. तसेच हे सर्व पंचनामे विभागीय आयुक्तांनी अंतिम करून ते कृषी आयुक्तांकडे पाठवावेत. पंचनाम्यासाठी विमा कंपन्यांनीही आवश्यक ती मदत करावी, असेही मुख्य सचिवांनी स्पष्ट केलं आहे.
पाऊस झाल्याने रब्बीच्या पेरणीसाठी शेतकरी लगबग करतील. त्यासाठी बी-बियाणे, खते यांची टंचाई भासणार नाही याचीही जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. बियाणे, खतांची टंचाई असल्यास शासनाच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचनाही मुख्य सचिवांनी दिल्या आहेत.