AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कष्टानं उभा केलेला ऊस डोळ्यादेखत वाळून जातोय; साडेदहा लाख टन ऊस गाळपाविना; सरकारची फक्त पोकळ अश्वासनं

अहमदनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात ऊस शेतातच असल्याने मोठ्या कष्ठाने उभा केलेला ऊस डोळ्यादेखत वाळून जात आहे.

कष्टानं उभा केलेला ऊस डोळ्यादेखत वाळून जातोय; साडेदहा लाख टन ऊस गाळपाविना; सरकारची फक्त पोकळ अश्वासनं
अतिरिक्त ऊसImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 18, 2022 | 8:55 PM
Share

अहमदनगरः अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात जवळपास साडेदहा लाख टन ऊस गाळपाविना (Sugarcane) आजही शेतात उभा आहे. गाळप हंगाम संपून गेला आहे. तरीही शेतकरी आपला ऊस तुटून जाण्याची आस लावून बसले आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने (Sugar Factory) बंद होणार नाहीत असे पोकळ आश्वासन राज्य सरकार देत असले तरी ऊस तोडणी कामगारांची कमतरता आणि गाळप क्षमता यामुळे लाखो टन ऊसाच्या शेतातच खोडक्या होईल असे चित्र सध्या‌ दिसत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 23 सहकारी आणि खासगी साखर कारखाने आहेत. यावर्षी जिल्ह्यात तब्बल पावणेदोन कोटी टन ऊस गाळपासाठी उभा होता. गाळप हंगाम एप्रिल महिन्याच्या शेवटी संपत असतो मात्र यावर्षी 15 मे उजाडला तरीही जिल्ह्यातील 14 साखर कारखाने सुरू आहेत.

ऊस तोडणी कामगार नाहीत

अनेक ऊसतोडणी कामगार आता आपापल्या गावी परतले आहेत.ऊस तोड कामगार गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला तोड मिळत नाही. साखर कारखान्यांचे व्यवस्थापन चुकल्याने हजारो शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे, त्यामुळे आता या उसाचे करायचे काय असा सवालही शेतकरीवर्गातून उपस्थित होत आहे.

ऊस डोळ्यादेखत वाळून गेला

अहमदनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात ऊस शेतातच असल्याने मोठ्या कष्ठाने उभा केलेला ऊस डोळ्यादेखत वाळून जात आहे. फडात राहिलेला ऊस तसाच राहिल्याने ज्या शेतकऱ्यांना ऊसतोडणी पाहिजे असेल तर तोडणी कामगारांसह इतरांनाही पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे आता आम्ही जगायचं कसं ? असा सवालही शेतकरी करत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात मातब्बर नेत्यांचे कारखाने

अहमदनगर जिल्ह्यात मातब्बर नेत्यांचे साखर कारखाने आहेत. कारखानदारांनी अगोदर स्वस्तात बाहेरचा ऊस आणून गाळप केला त्यामुळे कार्यक्षेत्रातील सभासदांचा ऊस आजही तसाच उभा राहिला आहे. कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील ऊसाचे करार असतात त्यांचाही ऊस गाळप करावा लागतो असं श्रीरामपूर येथील अशोक कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार भानुदास मुरकूटे यांनी मान्य केल आहे. त्यामुळे कारखान्याचे गैरव्यवस्थापन कसे आहे हे स्पष्टपणे दिसत आहे.

कांद्याला कवडीमोल भाव

कांद्याला कवडीमोल भाव, उसाचे गाळपच नाही, द्राक्षांना खरीददार मिळेना तेच टरबूजाबाबतीत होत आहे. एक ना अनेक संकटात बळीराजा सापडला असल्याने मायबाप सरकारने राजकारण सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.