AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad: घर तिथे बोअरवेलची स्पर्धा, औरंगाबादच्या सातारा देवळाईत 350 फुटांवरही झरा दिसेना!

सातारा देवळाईचा महानगरपालिकेत समावेश झाला. तेव्हा आता या भागात महापालिकेचे पाणी येईल, अशी नागरिकांना आशा होती. मात्र आता कुठे सात वर्षानंतर या भागात जलवाहिनीचे काम सुरु झाले आहे. तोपर्यंत भूगर्भातील पाण्यावरच नागरिकांचे जीवन अवलंबून आहे.

Aurangabad: घर तिथे बोअरवेलची स्पर्धा, औरंगाबादच्या सातारा देवळाईत 350 फुटांवरही झरा दिसेना!
सांकेतिक छायाचित्र
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 20, 2022 | 6:00 AM
Share

औरंगाबादः शहरातील सातारा देवळाई (Satara Deolai) परिसरात अद्याप कायमस्वरुपी पाणपुरवठ्याची योजना येण्यासाठी बराच अवधी आहे. 2015 मध्ये हा परिसर महापालिकेत (Aurangabad municipal corporation) समाविष्ट करण्यात आला. मात्र अजूनही येथे नळाद्वारे पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे मुबलक पाणी मिळण्यासाठी नागरिकांनी घरोघरी बोअरवेल घेऊन ठेवले आहेत. घर तिथे बोअरवेलची जणू स्पर्धाच या भागात पहायला मिळते. त्यामुळे या परिसरातील पाणी पातळी 350 फुटांपर्यंत खोल गेली आहे. आता नव्याने बोअर खोदणारे नागरिक पाण्याचे झरे कायम रहावेत म्हणून आणखी खोल बोअर (Borewell) घेतात. त्यामुळे येथील जमिनीची अक्षरशः चाळणी केल्याचे निदर्शनास आले आहे.

यंदा भरपूर पाऊस असूनही पातळी खोल

या वर्षी औरंगाबाद आणि संपूर्ण मराठवाड्यात विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्याची पाणीपातळीही कमालीची वाढली होती. एरवी सातारा भागातील बोअरवेलचे पाणी मार्च-एप्रिलपासून कमी होऊ लागते. यंदा बोअरचे पाण आटणार नाही, अशी आशा होती. मात्र मार्च महिन्यातच दरवर्षीप्रमाणे पाणी पातळी खोल गेली आहे. सातारा देवळाईचे भौगोलिक क्षेत्र हे सपाट नाही. डोंगर माथ्यावर आणि ओबडधोबड अवस्थेत उतारावर असल्याने पाणी पातळत झपाट्याने वाढ झाली. या परिसरात भूगर्भात काळा पाषाण असल्याने त्याचा फायदा बाजूच्या बोअरवेलला होता नाही.

अतिखोल बोअरवेल खोदणे धोकादायक

सातारा देवळाईचा महानगरपालिकेत समावेश झाला. तेव्हा आता या भागात महापालिकेचे पाणी येईल, अशी नागरिकांना आशा होती. मात्र आता कुठे सात वर्षानंतर या भागात जलवाहिनीचे काम सुरु झाले आहे. तोपर्यंत भूगर्भातील पाण्यावरच नागरिकांचे जीवन अवलंबून आहे. उन्हाळ्यात बोअरवेलचे पाणी आटल्यावर टँकर्सद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर येते. अशातच अनेक नागरिकांनी साडेदहा हजार फुटांवर बोअरवेल खोदले आहेत. अतिखोल बोअरवेल खोदणे हे धोकादायक ठरू शकते, असे भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे वारंवार सांगण्यात येते. तरीही नागरिकांनी असे प्रकार टाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच छतावरील वाहून जाणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण करावे, ज्या घरात नागरिकांनी बोअरवेल रिचार्ज करण्याची प्रक्रिया राबवलेली आहे, अशा नागरिकांना आजही पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

जलपुनर्भरण कसे करावे?

स्वतःचे बोअर असेल तर त्या बोअरमध्ये गच्चीवरील, छपरावरील अथवा जमिनीवर जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण केले जाऊ शकतके. अंगणाचा उतार तपासून, ज्या ठिकाणी पाणी जमण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी पाच फूट लांब, पाच फुट रुंद आणि आठ फूट खोल अशा आकाराचा खड्डा खणतात. या खड्ड्यात छोटे दगड, विटांचे तुकडे व जाड रेती यांचे समान थर टाकून खड्डा भरून टाकतात. सर्वात वर बारीक रेतीचा थर टाकतात. पाऊस सुरु झाल्यावर अंगणात जमा होणारे पाण जमिनीत मुरायला सुरुवात होते. जमिनीतील पाण्याचे प्रवाह या पाण्याला बोअरवेलकडे घेऊन जातात आणि बोअरवेलच उपशाची क्षमता वाढण्यास मदत होते. योग्य तज्ज्ञांच्या मदतीने पुनर्भरण केल्यास बोअरवेलचे पाणी वर्षभर टिकून राहते व वाया जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर होण्यास मदत होते.

इतर बातम्या-

Osmanabad | सक्षणा सलगरांच्या जाचाला कंटाळून पक्ष सोडला, भाजप आक्रमक, जि. परिषदेत गोंधळ, उस्मानाबादेत काय घडतंय?

हा देवेंद्र फडणवीसांचा B Plan!! MIM ला घुसवून महाविकास आघाडी तोडण्याचा डाव, औरंगाबादेत Khaire यांचा आरोप

Follow Us
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत