AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बुलबुल’ चक्रीवादळाचा कहर, 5 लाख घरं उद्ध्वस्त, 23,811 कोटींचं नुकसान

पश्चिम बंगालमध्ये ‘बुलबुल' चक्रीवादळाने (Bulbul Cyclone in Wesh Bengal) प्रचंड नुकसान केलं आहे. या वादळाने बंगालमधील तब्बल 5 लाख घरं उद्ध्वस्त केली आहेत.

‘बुलबुल’ चक्रीवादळाचा कहर, 5 लाख घरं उद्ध्वस्त, 23,811 कोटींचं नुकसान
| Updated on: Nov 17, 2019 | 8:40 AM
Share

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये ‘बुलबुल’ चक्रीवादळाने (Bulbul Cyclone in Wesh Bengal) प्रचंड नुकसान केलं आहे. या वादळाने बंगालमधील तब्बल 5 लाख घरं उद्ध्वस्त केली आहेत. तसेच 23,811 कोटींचं नुकसान झालं आहे. वादळाचा सर्वाधिक फटका पश्चिम बंगालमधील 3 जिल्ह्यांना बसला आहे. याचा जवळपास 35 लाख लोकांवर परिणाम झाला आहे. राज्य सरकारने ‘बुलबुल’ चक्रीवादळाने ((Bulbul Cyclone in Wesh Bengal)) झालेल्या नुकसानीबाबत शनिवारी (16 नोव्हेंबर) केंद्र सरकारला एक अहवाल देखील पाठवला आहे.

केंद्रीय दलाच्या सदस्यांनी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांच्यासोबत बैठकही घेतली आहे. यावेळी या पथकालाही वादळाच्या नुकसानीबाबतचा अहवाल सादर करण्यात आला. केंद्रीय दलाच्या अधिकाऱ्यांनी चक्रीवादळ्याच्या नुकसानीची माहिती घेतली आहे. या पथकाने नुकसानीची पाहणी करण्यासाठी उत्तर आणि दक्षिण 24 परगना आणि पूर्व मिदनापूर जिल्ह्याचा दौराही केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अहवालाच्या आधारे माहिती दिली, “राज्यात बुलबुल चक्रीवादळाने 3 प्रभावित जिल्ह्यांमध्ये एकूण 23,811 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. 35 लाख लोकांवर याचा थेट परिणाम झाला आहे. या वादळाने जवळपास 5,17,535 घरं उद्ध्वस्त झाली आहेत.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी वादळाचा फटका बसलेल्या नागरिकांच्या मदतीवरुन राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या, “बुलबुल वादळाने नुकसान झालेल्या नागरिकांना मदत पोहचवण्याच्या कामात राजकारण व्हायला नको.” राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी देखील बॅनर्जी यांच्या मताशी सहमती दाखवली आहे.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...