AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पवारांना तेवढं भाजपमध्ये घेऊ नका: उद्धव ठाकरे

अमरावती: आता टीका करायची कोणावर हा प्रश्न आहे, कारण आज टीका करायची आणि उद्या तेच शिवसेनेत नाहीतर भाजपमध्ये दिसायचे. आता शरद पवार यांच्यावर टीका करायची की नाही हे कळत नाही, त्यांना तेवढं भाजपमध्ये घेऊ नका, अशी मिश्किल टिपण्णी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना-भाजप युतीचा पहिला एकत्र पदाधिकारी मेळावा अमरावतीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री […]

आता पवारांना तेवढं भाजपमध्ये घेऊ नका: उद्धव ठाकरे
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

अमरावती: आता टीका करायची कोणावर हा प्रश्न आहे, कारण आज टीका करायची आणि उद्या तेच शिवसेनेत नाहीतर भाजपमध्ये दिसायचे. आता शरद पवार यांच्यावर टीका करायची की नाही हे कळत नाही, त्यांना तेवढं भाजपमध्ये घेऊ नका, अशी मिश्किल टिपण्णी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना-भाजप युतीचा पहिला एकत्र पदाधिकारी मेळावा अमरावतीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी शिवसेना-भाजप युती हा फेव्हिकॉलचा जोड आहे, तुटणार नाही, असं म्हटलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात मुंबई पूल दुर्घटनेचा उल्लेख करतील अशी आशा होती. मात्र त्यांनी सर्व भाषण राजकारणावर केंद्रीत केलं.

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरुन उद्धव ठाकरे यांनी चिमटा काढला.

“आता टीका करायची कोणावर हा प्रश्न आहे कारण आज टीका करायची आणि उद्या तेच सेनेत नाहीतर भाजप मध्ये दिसायचे. पवारांवर टीका करायची की नाही हे कळत नाही, मात्र त्यांना भाजपमध्ये घेऊ नका”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

15-20 दिवस झाले काय बोलायचं कळत नव्हतं. शिवसेना-भाजपकडून उघड तलवारी काढल्या होत्या, काही गोष्टी झाल्या त्या सगळ्या विसरा आणि आता खऱ्या तलवारी काढून मैदानात उतारा. आमच्यात जो संघर्ष झाला तो आम्ही विकासाच्या आणि राज्याच्या आड येऊ दिला नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना मी नरेंद्र भाई म्हणतो करण त्यांच्यावर मला गर्व आहे. कोणाला वाटेल मी असं कसं बोललो, पण त्यांनी जनतेसाठी, सामान्य माणसाच्या हिताचं काम केलं. भाजप-शिवसेना ही जनतेचा आधार आहे, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

आमच्यात झालेला संघर्ष विसरु नका मात्र तो संघर्ष बघा जेव्हा देशासाठी बाळासाहेब आणि अटलजींनी केला तो मोठा संघर्ष आहे. आधीच्या काळात आमच्यासोबत येत कोण होतं? आम्हाला धर्मवादी म्हणायचे मात्र आमच्या मागच्या पिढीने जो संघर्ष केला, त्यामुळे आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळतो, असं उद्धव यांनी सांगितलं.

ज्या योजना जनतेच्या हिताच्या आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवा हेच महत्वाचं आहे. आमच्या भाषणांपेक्षा जनतेला दोघांना एका मंचावर बघायचं होतं ते झालं. युती झाली नसती तर काय झालं असत? ऐटीत चालणारे त्याचा फायदा घेत होते आणि राज्यकर्ते झाले असते, असं उद्धव म्हणाले.

आता जे करायचं ते मनापासून करायचं. कोणी गद्दारी करणार नाही. आता भाजप सेना विसरा भगवा बघा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

बाळासाहेबांनी हे आज दिसत असलेलं वैभव बघितलं असतं तर त्यांना आनंद झाला असता, असं भावनिक उद्गार उद्धव यांनी काढले.

बाळासाहेब ठाकरेंनी जी पहिली सभा घेतली, ती शिवाजी पार्कवर. तसंच आपल्याला करायचं आहे. आपल्या 48 जागा सुद्धा कमी पडतील असं काही करायचं आहे. एकही जागा दुसऱ्याला मिळता कामा नये, असं उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक