AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावात वीज पडून पाच जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील चौघांचा अंत

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे (Five died after lightning strike). तालुक्यातील भंवरखेडे या गावात ही दु:खद घटना घडली. या घटनेत मृत्यू झालेल्य़ांपैकी चार जण हे एकाच कुटुंबातील आहेत.

जळगावात वीज पडून पाच जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील चौघांचा अंत
| Updated on: Sep 26, 2019 | 4:47 PM
Share

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे (Five died after lightning strike). तालुक्यातील भंवरखेडे या गावात ही दु:खद घटना घडली. या घटनेत मृत्यू झालेल्य़ांपैकी चार जण हे एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे (Jalgaon lighting strike). तर इतर एक महिला ही रोजंदारीवर काम करणारी होती.

रघुनाथ पाटील यांच्या शेतात आज ज्वारी कापणीचे काम सुरू होते. शेताता ज्वारी कापणीचे काम करत असताना दुपारी आचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. त्यामुळे आडोशासाठी हे पाचही जण झाडाखाली थांबले. मात्र, इथेच त्यांच्यावर काळ चालून आला. मुसळधार पावसात वीज पडून या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेत चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा महणजे सासू-सासरे, दोन सुना यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस आणि महसूल यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली.

मृतांमध्ये रघुनाथ दशरथ पाटील (वय 50), त्यांची पत्नी अलका रघुनाथ पाटील (वय 45), मोठी सून शोभा भागवत पाटील (वय 33), लहान सून लता उदय पाटील (वय 30) आणि रोजंदारीवर काम करणारी कल्पना भैय्या पाटील (वय 35 ) यांचा समावेश आहे.

झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा.