AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Power Cut ! मुंबईची बत्ती गुल; कंगनाचा ठाकरे सरकारवर निशाणा

अभिनेत्री कंगना रणौतशिवाय प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनीही ट्विट केलं आहे. संपूर्ण मुंबईत वीज गायब झालीय. हे अनपेक्षित आहे. एखाद्या बोगद्यात असावं अशा पद्धतीने मुंबई अंधारात गेलीय, अशी टीका शोभा डे यांनी ट्विटमधून केली आहे. हे ट्विट करताना त्यांनी मुंबई महापालिका आणि टाटा पॉवरला टॅगही केलं आहे.

Mumbai Power Cut ! मुंबईची बत्ती गुल; कंगनाचा ठाकरे सरकारवर निशाणा
| Updated on: Oct 12, 2020 | 2:18 PM
Share

मुंबई: संपूर्ण मुंबई-ठाण्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने मुंबई-ठाणेकर त्रस्त झालेले असतानाच नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून मीम्सच्या माध्यामातून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. नेटवर मीम्सचा पाऊस पडत असतानाच अभिनेत्री कंगना रणौतनेही या संधीचा फायदा घेत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.(kangana ranaut slams maharashtra government)

वीज पुरवठा खंडित झाल्याने कंगनाने एक ट्विट केलं असून या ट्विटमध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा फोटोही पोस्ट केला आहे. त्यानंतर या फोटोला कंगनाने कॅप्शन दिली असून ‘मुंबईमध्ये Powercut, अशावेळी महाराष्ट्र की सरकार क-क-क……कंगना’, अशी खोचक टीका कंगनाने केली आहे. तर, अभिनेते अनुपम खेर यांनीही ‘बत्ती गुल’ असं ट्विट करत महाराष्ट्र सरकारला डिवचले आहे. अरमान मलिकनेही वीज गेल्याचं म्हटलं आहे.

या शिवाय प्रसिद्ध लेखिका आणि स्तंभलेखिका शोभा डे यांनीही ट्विट केलं आहे. संपूर्ण मुंबईत वीज गायब झालीय. हे अनपेक्षित आहे. एखाद्या बोगद्यात असावं अशा पद्धतीने मुंबई अंधारात गेलीय, अशी टीका शोभा डे यांनी ट्विटमधून केली आहे. हे ट्विट करताना त्यांनी मुंबई महापालिका आणि टाटा पॉवरला टॅगही केलं आहे.

दरम्यान, आज संपूर्ण मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्याने मुंबई अंधारात गेली होती. महापारेषणच्या सर्किट केंद्राचे देखभाल दुरूस्तीचे काम सुरू होते. मात्र अचानक बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सोमोरे जावे लागले, असं मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केलं. दरम्यान, वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा परिणाम मुंबईच्या लोकलवर देखील झाला. त्यामुळे मुंबईकडे कामावर येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रचंड खोळंबा झाला. या चाकरमान्यांना सुमारे दोन ते अडीच तास लोकलमध्ये खोळंबून राहावे लागले होते. त्यामुळे अनेक प्रवासी संतापही व्यक्त करत होते. (kangana ranaut slams maharashtra government)

संबंधित बातम्या:

mumbai power cut ! मुंबई-ठाण्यातील बत्तीगुल झाल्याने रेल्वे, इंटरनेट ठप्प; रुग्णालयांनाही फटका

Mumbai Power Cut: मुंबईची बत्ती गुल; कार्यालये आणि रेल्वे वाहतूक ठप्प

Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल

(kangana ranaut slams maharashtra government)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.