काँग्रेस नेत्यांची दिल्लीत खलबतं, सोनियांच्या खास माणसाला भेटून महाराष्ट्रातील रणनीती ठरली?

भाजप-शिवसेनेतील सत्तावाटपाच्या भांडणात काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका काय याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहे.

काँग्रेस नेत्यांची दिल्लीत खलबतं, सोनियांच्या खास माणसाला भेटून महाराष्ट्रातील रणनीती ठरली?
Follow us
| Updated on: Nov 01, 2019 | 4:25 PM

नवी दिल्ली: भाजप-शिवसेनेतील सत्तावाटपाच्या भांडणात काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका काय याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहे. निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधीपक्षात बसण्याची भाषा बोलली गेली असली तरी आता दोन्ही काँग्रेस यानिमित्ताने भाजपला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याचाच भाग म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह (Maharashtra Congress Leader in Delhi) काही नेत्यांनी दिल्लीत पक्षाचे वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली.

वेणुगोपाल यांच्या भेटीबाबत (Maharashtra Congress Leader in Delhi) बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “या भेटीत आम्ही त्यांना महाराष्ट्राच्या परिस्थितीविषयी आणि विधानसभा निवडणुकीतील आमच्या कामाविषयी माहिती दिली. सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसार आम्ही वेणुगोपाल यांची भेट घेतली. आम्हाला विस्तृत चर्चा करायची असल्याने सोनिया गांधी यांनी आम्हाला वेणुगोपाल यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले.”

महाराष्ट्राच्या परिस्थितीवर आमची नजर आहे आणि सध्या “वेट अँड वॉच” ही परिस्थिती असल्याचं देखील थोरात यांनी यावेळी नमूद केलं.

या बैठकीला उपस्थित माणिकराव ठाकरे म्हणाले, “आज महाराष्ट्रात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला पूर्णपणे भाजप जबाबदार आहे. सध्या आमचं काहीही ठरलेलं नाही.” आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनाधार मिळालेला आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. तर अशोक चव्हाण यांनी शिवसेनेसोबत जाण्याची सध्या चर्चा नसल्याचं म्हणतानाच राजकारणात अनेक शक्यता असतात. त्यामुळे वाट बघणे हेच योग्य असल्याचं सूचक वक्तव्य केलं.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.