AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये 4 जानेवारीपासून शाळा सुरू होणार; तर जळगावमधील शाळांचा निर्णय सोमवारी!

राज्यातील इतर शहरांप्रमाणेच नाशिकमध्येही तूर्तास शाळा सुरू होणार नाही. 4 जानेवारीपासून नाशिकमधील शाळा सुरू होणार असून जळगावमधील शाळा सुरू करण्याचा निर्णय उद्या सोमवारी घेण्यात येणार आहे. (maharashtra: schools in nashik to remain shut till january 4)

नाशिकमध्ये 4 जानेवारीपासून शाळा सुरू होणार; तर जळगावमधील शाळांचा निर्णय सोमवारी!
| Updated on: Nov 22, 2020 | 2:34 PM
Share

नाशिक: राज्यातील इतर शहरांप्रमाणेच नाशिकमध्येही तूर्तास शाळा सुरू होणार नाही. 4 जानेवारीपासून नाशिकमधील शाळा सुरू होणार असून जळगावमधील शाळा सुरू करण्याचा निर्णय उद्या सोमवारी घेण्यात येणार आहे. (maharashtra: schools in nashik to remain shut till january 4)

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांनी ही माहिती दिली. शाळा उघडण्याचा निर्णय पुढे ढकलला तर योग्यच ठरेल असं पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या 4 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून परिस्थिती पाहून 4 जानेवारीपासून शाळा सुरू करण्यात येणार आहे. मात्र परिस्थितीनुसार निर्णय बदलण्यात येऊ शकतो, असं भुजबळ म्हणाले. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांच्या टेस्ट करण्यात येणार असून शाळांना सॅनिटाइज करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 45 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

शहरात कोणताही लॉकडाऊन अथवा कर्फ्यू नाही. मात्र, नागरिकांनी सतर्क राहावे. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. मास्कशिवाय फिरू नये. हात स्वच्छ धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदी गोष्टींवर भर देण्यात यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

जळगावचा निर्णय उद्या

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील शाळा सुरू करायच्या की नाहीत? याचा निर्णय उद्या सोमवारी घेण्यात येणार असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत सातशे शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असून शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे, असं सांगतानाच उद्या शाळा सुरू होणार आहे. पण शाळा सुरू करण्याबाबतचे संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असं पाटील म्हणाले.

कोल्हापुरात उद्या शाळा सुरू नाही

कोल्हापुरातही उद्या शाळा सुरू होणार नाहीत. जिल्हाधिकाऱ्याने उद्यापासून शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार असल्याचं कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याने सांगितलं.

नागपुरात 25 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार

नागपूरमध्येही उद्यापासून शाळा सुरू होणार नाहीत. नागपूरमध्ये येत्या 25 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरमध्ये 41 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे 23 आणि 24 तारखेला कोरोनाच्या स्थितीचा पुन्हा आढावा घेण्यात येणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. तसेच मनपा हद्दीतील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

नागपूर जिल्ह्यात 41 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, मनपा हद्दीतील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

नांदेडमध्ये 22 शिक्षकांना कोरोनाची बाधा, विद्यार्थी पालकांमध्ये भीतीचं वातावरण

उस्मानाबादेत 48, नागपुरात 41, बीडमध्ये 25, कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह?

(maharashtra: schools in nashik to remain shut till january 4)

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.