लिबियात अपहरण झालेल्या 7 भारतीयांची महिन्यानंतर सुटका

लिबियात सप्टेंबर महिन्यात अपहरण झालेल्या 7 भारतीयांची महिन्यानंतर सुटका करण्यात यश आले आहे. ट्युनिशियातील भारतीय दुतावासाने लिबिया सरकारच्या मदतीनं भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते.

लिबियात अपहरण झालेल्या 7 भारतीयांची महिन्यानंतर सुटका
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 2:07 PM

नवी दिल्ली :  लिबियामध्ये अपहरण झालेल्या 7 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात यश आले आहे. सप्टेंबर महिन्यात नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. आध्रं प्रदेश, बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील नागरिकांचा यामध्ये समावेश होता. 14 सप्टेंबरला लिबियातील अश्शरीफ येथून नागरिकांचे अपहरण झाले होते. ( Seven kidnaped Indians rescued in Libya)

ट्युनेशियातील भारतीय राजदुतांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लिबियामध्ये भारतीय उच्चायुक्तांचं कार्यालय नाही. ट्युनेशियातील राजतदुतांकडून लिबियातील भारतीयांसंबधी कामकाज केले जाते. लिबियातील सरकारच्या मदतीने भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.

विदेश मंत्रालयानं अपहरण झालेले नागरिक सुरक्षित असल्याची माहिती 9 ऑक्टोबरला दिली होती. अपहरणकर्त्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी भारतीय नागरिकांचे फोटो पाठवले होते. खंडणीसाठी भारतीयांचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी भारतीयांसोबत कोणताही गैरव्यवहार केलेला नाही.

लिबियात यापूर्वी देखील भारतीयांचं अपहरण

लिबियात भारतीय नागरिकांच्या अपहरणाच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. मात्र, त्यावेळी अपहरण झालेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली होती. लिबियातील विमानतळ परिसरातून अनेकदा भारतीय नागरिकांचं अपहरण झालं आहे. त्रिपोली विमानतळ मार्गावरुन जात असताना 7 नागरिकांचं अपहरण करण्यात आलं होतं.

भारतीय नागरिकांच्या अपहरणाच्या घटना समोर आल्यानंतर 2015 मध्ये भारतीय नागरिकांना लिबियामध्ये न जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. 2016 मध्ये भारतीय नागरिकांना लिबिया प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. ती बंदी सध्या देखील लागू आहे.

संबंधित बातम्या :

भारतात येण्याआधीच राफेलच्या कामगिरीची चर्चा, चीनसारख्या देशाला भीती का वाटते?

ब्लॉग : ‘दिव्याखाली अंधार’ असताना अमेरिकेचं भारताकडे बोट

( Seven kidnaped Indians rescued in Libya)

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.