AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिबियात अपहरण झालेल्या 7 भारतीयांची महिन्यानंतर सुटका

लिबियात सप्टेंबर महिन्यात अपहरण झालेल्या 7 भारतीयांची महिन्यानंतर सुटका करण्यात यश आले आहे. ट्युनिशियातील भारतीय दुतावासाने लिबिया सरकारच्या मदतीनं भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते.

लिबियात अपहरण झालेल्या 7 भारतीयांची महिन्यानंतर सुटका
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Oct 12, 2020 | 2:07 PM
Share

नवी दिल्ली :  लिबियामध्ये अपहरण झालेल्या 7 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात यश आले आहे. सप्टेंबर महिन्यात नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. आध्रं प्रदेश, बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील नागरिकांचा यामध्ये समावेश होता. 14 सप्टेंबरला लिबियातील अश्शरीफ येथून नागरिकांचे अपहरण झाले होते. ( Seven kidnaped Indians rescued in Libya)

ट्युनेशियातील भारतीय राजदुतांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लिबियामध्ये भारतीय उच्चायुक्तांचं कार्यालय नाही. ट्युनेशियातील राजतदुतांकडून लिबियातील भारतीयांसंबधी कामकाज केले जाते. लिबियातील सरकारच्या मदतीने भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.

विदेश मंत्रालयानं अपहरण झालेले नागरिक सुरक्षित असल्याची माहिती 9 ऑक्टोबरला दिली होती. अपहरणकर्त्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी भारतीय नागरिकांचे फोटो पाठवले होते. खंडणीसाठी भारतीयांचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी भारतीयांसोबत कोणताही गैरव्यवहार केलेला नाही.

लिबियात यापूर्वी देखील भारतीयांचं अपहरण

लिबियात भारतीय नागरिकांच्या अपहरणाच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. मात्र, त्यावेळी अपहरण झालेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली होती. लिबियातील विमानतळ परिसरातून अनेकदा भारतीय नागरिकांचं अपहरण झालं आहे. त्रिपोली विमानतळ मार्गावरुन जात असताना 7 नागरिकांचं अपहरण करण्यात आलं होतं.

भारतीय नागरिकांच्या अपहरणाच्या घटना समोर आल्यानंतर 2015 मध्ये भारतीय नागरिकांना लिबियामध्ये न जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. 2016 मध्ये भारतीय नागरिकांना लिबिया प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. ती बंदी सध्या देखील लागू आहे.

संबंधित बातम्या :

भारतात येण्याआधीच राफेलच्या कामगिरीची चर्चा, चीनसारख्या देशाला भीती का वाटते?

ब्लॉग : ‘दिव्याखाली अंधार’ असताना अमेरिकेचं भारताकडे बोट

( Seven kidnaped Indians rescued in Libya)

Follow Us
तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत
Pune | तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
Sunil Tatkare | दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....
रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
Jalgaon Banana Loss | रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
Chhatrapati Sambhajinagar | महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त, आकडा जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!