विद्यार्थ्यांनी हिंदुस्थानी भाऊच्या सांगण्यावरून अनेक ठिकाणी आंदोलन केलं. त्यानंतर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन झाल्याचं आपण पाहिलं. सद्या त्या हिंदुस्थानी भाऊला अटक केली असून संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय पाठबळ असल्याशिवाय विद्यार्थ्यांचे आंदोलन शक्य नाही असं राऊत म्हणाले. काही राजकीय लोक समाजमाध्यमांच्या साहाय्याने मुलांना बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.