AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tanushree Dutta | नाना पाटेकरांच्या बॉलिवूड पुनरागमनवर तनुश्री दत्ताचा संताप, म्हणाली…

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर 2018 मध्ये ‘Me Too’ चळवळींतर्गत लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. तनुश्री म्हणाली होती की, नाना पाटेकर यांनी 2008 साली 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्याशी गैरवर्तन केले होते.

Tanushree Dutta | नाना पाटेकरांच्या बॉलिवूड पुनरागमनवर तनुश्री दत्ताचा संताप, म्हणाली...
| Updated on: Nov 07, 2020 | 4:36 PM
Share

मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर 2018 मध्ये ‘Me Too’ चळवळींतर्गत लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. तनुश्री म्हणाली होती की, नाना पाटेकर यांनी 2008 साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्याशी गैरवर्तन केले होते. तनुश्री पाठोपाठ अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाविषयी खुलेपणाने बोलल्या होत्या. त्यांनंतर चित्रपट सृष्टीचे वातावरण चांगलेच तापले होते. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर बरेच दिवस हे प्रकरण चर्चिले गेले होते.(Tanushree Dutta anger from Nana Patekar’s Bollywood comeback)

बऱ्याच लोकांनी नाना पाटेकर असे करू शकत नाही, असे म्हटले. तर, काहींनी तनुश्री दत्ताला समर्थन दिले. त्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी झाली आणि नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळाली. मात्र, या सर्वांमध्ये नाना पाटेकरांना अनेक चित्रपट गमवावे लागले. आता दोन वर्षांनंतर नाना पाटेकर चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहेत. मात्र, यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाराजी व्यक्त केली आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांना ‘हाऊसफुल 3’सह अनेक बड्या चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर ते पुन्हा काम सुरू करणार आहेत. ते लवकरच फिरोज नाडियादवालाच्या वेब सीरीजमध्ये दिसणार आहेत. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत, नाना पाटेकरांना मोठा मंच मिळाल्याबद्दल तनुश्री दत्ता हिने नाराजी व्यक्त करत म्हटले की, ‘माझा छळ करून, माझा अपमान केल्यानंतर, मला आणि माझ्या कुटुंबाला धमकावले, आमच्यावर हल्ले केले. माझ्या घरी गुंड पाठवले. भाड्याने घेतलेल्या गुंडांनी मला धमकावले, माझे फिल्मी करिअर आणि आयुष्य खराब केले. माझ्या न्यायासाठीच्या लढाईनंतर बॉलिवूडमधील बडे निर्माते नाना पाटेकर यांच्यासारख्या माणसाला काम कसे देऊ शकतात?’, असे म्हणत तनुश्री दत्ताने आपला संताप व्यक्त केला. सुशांतच्या न्यायाबद्दल बोलले जात आहे, मला न्याय कुठे मिळाला? मी विनंती करते, या अशा लोकांना परत काम देऊ नका, असे देखील ती म्हणाली. नाना पाटेकर यांच्या विरोधात लढा सुरूच राहणार का? नाना पाटेकरांविरोधात लढा सुरू ठेवण्यावर तनुश्री दत्ता म्हणाली की, ‘मला पैसे भरावे लागतात आणि कोणीही पाठिंबा देत नाही. तेव्हा मी कसे लढू? मला अभिमान वाटतो की, कंगना आणि बाकी काही लोकांचा सध्या सत्याच्या बाजूने लढताना दिसतात.(Tanushree Dutta anger from Nana Patekar’s Bollywood comeback)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.