AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोर्डाच्या परीक्षेचं टेन्शन घेऊ नका, ‘ही’ चार योगासने करा, फायदे जाणून घ्या

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. परीक्षा सुरु असली तरी कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुमचं टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बोर्डाच्या परीक्षेदरम्यान मुले तणावाखाली असतात. तणावमुक्त राहण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही योगासनांचा समावेश करू शकता. चला जाणून घेऊया.

बोर्डाच्या परीक्षेचं टेन्शन घेऊ नका, ‘ही’ चार योगासने करा, फायदे जाणून घ्या
yogaImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Feb 23, 2025 | 2:15 PM
Share

दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा असली की विद्यार्थ्यांना टेन्शन येतंच. हे टेन्शन कमी व्हावं, यासाठी पालकांचेही वेगवेगळे प्रयत्न सुरूच असतात. पण, आज आम्ही यावर एक खास उपाय सांगणार आहोत. त्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. फक्त पुढील चार योगासने जाणून घेऊया.

बोर्डाची परीक्षा हा मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. प्रत्येक मुलाला बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतात. पण या काळात मुलांना खूप ताणही येतो. अशा वेळी मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. परीक्षेदरम्यान मानसिक आणि शारीरिक थकवा टाळण्यासाठी मुलांनी योगा करावा.

10 ते 15 मिनिटे काही आसनांचा सराव केल्याने शरीराला आराम तर मिळतोच पण मनही ताजेतवाने होते. यामुळे अभ्यास आणि परीक्षेत चांगली कामगिरी करता येते.

ताडासन

ताडासन हे एक सोपे आणि प्रभावी आसन आहे. यामुळे शरीराला ताणण्याबरोबरच ऊर्जा मिळते. हे आसन उभे राहून केले जाते. मुलांना ताडासन केल्याने शरीरात लवचिकता तर येतेच, शिवाय मानसिक ताणही कमी होण्यास मदत होते.

कृती

  • दोन्ही पाय जोडून सरळ उभे राहा
  • दोन्ही हात डोक्यावरून वर उचलून बोटे जोडावीत
  • दीर्घ श्वास घेताना संपूर्ण शरीर ताणून उभे रहा
  • 5 ते 10 सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर सामान्य स्थितीत परत या

वृक्षासन

वृक्षासन हे संतुलन आणि मानसिक शांती वाढवणारे एक आसन आहे. परीक्षेच्या काळात मानसिक संतुलन राखण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरू शकते.

कृती

  • सरळ उभे राहा आणि एक पाय गुडघा वाकवून दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा
  • दोन्ही हात जोडून डोक्यावरून वर उचला
  • 5 ते 10 मिनिटे या स्थितीत राहून खोल श्वास घ्या
  • नंतर हळूहळू सामान्य स्थितीत परत जा आणि दुसऱ्या पायाने हीच प्रक्रिया करा

पश्चिमचिमोत्तसन

शरीराला आराम देण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी हे आसन अतिशय प्रभावी आहे. यामुळे शरीराचा मागचा भाग ताणला जातो.

कृती

  • सरळ जमिनीवर बसा, दोन्ही पाय पुढे पसरून
  • दीर्घ श्वास घ्या आणि कंबरेपासून वाकताना पायाची बोटे पकडण्याचा प्रयत्न करा
  • 10-15 सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर सामान्य स्थितीत परत जा

खोल श्वास घेणे

खोल श्वास घेतल्याने मानसिक शांती आणि एकाग्रता वाढते. बोर्डाच्या परीक्षेदरम्यान मुलांना अस्वस्थ आणि तणाव जाणवू शकतो, म्हणून दीर्घ श्वास घेतल्यास त्यांचे मन शांत राहते.

कृती

  • बसा आणि डोळे बंद करा
  • नाकातून दीर्घ श्वास घ्या आणि नंतर तोंडातून हळूहळू श्वास सोडा
  • ही प्रक्रिया 5 ते 10 मिनिटे करा

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.