AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळशीची पाने पोटाची चरबी कमी करण्यासाठी रामबाण, फक्त या प्रकारे वापरा

तुळशीच पान आपल्या आरोग्यसाठी खूप गुणकारी मानले जाते. तुळशीचे असे अनेक फायदे आहेत ज्यामुळे आपल्या शरीरातील लठ्ठपणा कमी होऊ शकतो. त्याच बरोबर इतर आजारांना देखील कमी करू शकतो. हे आर्टिल तुम्हाला घरच्या घरी तुळशीच्या पानाने आजारांना पळून टाकण्यात मदत करेल.

तुळशीची पाने पोटाची चरबी कमी करण्यासाठी रामबाण, फक्त या प्रकारे वापरा
Tulsi leavesImage Credit source: TV9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Mar 20, 2025 | 12:15 AM
Share

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, जिथे कामाच्या ताणात आपल्या आहाराकडे लक्ष देणे खूप कठीण होऊन बसले आहे, तिथे शरीराला आवश्यक पोषण मिळवणंही एक आव्हान बनले आहे. या अनियमित आहारामुळे अनेक लोकांच्या पोटाची चरबी वाढते, जी न केवळ सौंदर्यासाठी, तर आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते. परंतु, जर तुम्ही पोटाची चरबी कमी करण्याचा विचार करत असाल, तर तुळशीच्या पानांचा वापर तुम्हाला खूप मदत करू शकतो! तुळशीच्या पानांमध्ये असलेल्या अद्भुत गुणांनी वजन कमी करण्यास मदत केली आहे. तर, जाणून घेऊया की तुळशीची पाने पोटाची चरबी कमी करण्यासाठी कशी प्रभावी ठरतात!

पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुळशी कशी फायदेशीर आहे?

तुळशी केवळ आयुर्वेदातच नाही तर मॉडर्न सायन्स मध्ये सुधा औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. तुळशीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि मेटाबॉलिज्म वाढवणारे गुणधर्म आढळतात जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेस मदत देते. तुळशीच्या पानांमध्ये असलेले {फायटोन्युट्रिएंट्स} शरीरातील चरबी जाळून त्याचे ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करतात.

असा पोटाच्या चरबीसह वजनही कमी करा

१) तुळशीचा चहा :

तुळशीचा चहा प्याल्याने मेटॅबोलिसम वाढते आणि चरबी कमी होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. यासाठी फक्त ८- १० तुळशीची पाने पाण्यात उकळा. त्यात थोडे मध व थोडा लिंबाचा रस मिसळून ते नियमित सकाळी प्या.

२) तुळस आणि मध :

तुळशीच्या पानांचा रस काढून त्यात मध टाकून सकाळी उपाशी पोटी प्या. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते व चरबी कमी करण्यात मदत करते. हे नियमित प्याल्याने पोटाची चरबी लवकर कमी होते.

३) तुळस आणि आल्याचा काढा पिणे :

तुळशीची पानं आणि आलं पाण्यात उकळून त्याचा कडा बनवा. त्यात थोडे मध मिसळून प्या. ही पद्धत पोटाची चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरते.

४) तुळशीचे पाने चघळणे :

रोज सकाळी ४-५ तुळशीची पाने उपाशी पोटी चघळल्यानेही पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. तुळशीच्या पानांमुळे पचन क्रिया सुधारते व शरीरात जमा होणारी अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते.

५) तुळस आणि दालचिनीचे पाणी पिणे :

तुळशीची पाने आणि दालचिनी एक ग्लास पाण्यात उकळून हे पाणी प्या. हे पाणी शरीरातील मेटॅबोलिसम समतोल करते व पोटाची चरबी कमी करण्यात प्रभावी ठरते.

तुळशीच्या पानांचे अजून बरेच फायदे आहेत, जसे…

तुळशी केवळ पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते असे नाही तर ती शरीराला इतर अनेक फायदे देखील देते. तुळशीच पान रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, तणाव कमी करते व त्वचा निरोगी ठेवते. याशिवाय तुळशीची पाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.