AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाणी बदलल्यामुळे केस गळतात का? तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या

Hair Loss Tips: हिवाळ्यात केसांच्या अनेक समस्या असतात. हवामानातील बदलादरम्यान केस गळणे, तुटणे, कोरडेपणा तसेच कोंडा होण्याची समस्या उद्भवते. त्याचप्रमाणे केसांची काळजी घेणं गरजेचं असते. काही लोकांचा असाही विश्वास आहे की, पाणी बदलल्याने केस गळतात. पण, हे सत्य आहे का? जाणून घ्या.

पाणी बदलल्यामुळे केस गळतात का? तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या
Hair and WaterImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jan 10, 2025 | 2:10 PM
Share

Hair Loss Tips: पाणी बदलणे आणि केस गळणे यांचा थेट संबंध आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आम्ही आज तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. हिवाळ्यात केसांची काळजी घेणं गरजेचं असतं. ही काळजी आपण कशी घेणार, याविषयी जाणून घेऊया आणि पाणी बदलणे आणि केस गळणे, याचा नेमका काय संबंध आहे, हे देखील जाणून घेऊया. केस गळणे ही आता एक सामान्य समस्या बनली आहे. केस गळण्याच्या समस्येने बहुतेक लोक त्रस्त असतात. याचे कारण खराब जीवनशैली तसेच अनुवांशिकता आहे. परंतु काही लोकांना असे वाटते की पाणी बदलल्यामुळे केस गळतात. हा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात येतो. तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

दिल्लीतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अंजली धीमान सांगतात की, जेव्हा तुम्ही नवीन ठिकाणी जाता किंवा प्रवास करता तेव्हा अनेकदा केस गळायला सुरुवात झाल्यासारखं वाटतं. पण तसे नाही, पाणी बदलणे आणि केस गळणे यांचा थेट संबंध नाही. हा एक गैरसमज आहे.

केस गळण्याची अनेक कारणे

नव्या ठिकाणच्या पाण्याशी केसांना जुळवून घ्यायला थोडा वेळ लागू शकतो, पण त्याचा थेट संबंध केस गळतीशी नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की पोषणाचा अभाव, हार्मोनल बदल, तणाव, चुकीच्या केसांची काळजी घेणाऱ्या उत्पादनांचा वापर किंवा कोणतीही वैद्यकीय स्थिती.

केसांची मुळे कमकुवत नसतात

जेव्हा आपण एखाद्या नवीन ठिकाणी जाऊन तेथील पाण्याचा वापर करतो, तेव्हा त्यातील खनिजांचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. जर पाण्यात कडकपणा जास्त असेल तर केस कोरडे आणि निर्जीव दिसू शकतात. पण यामुळे केसांची मुळे कमकुवत होत नाहीत किंवा पाण्याच्या बदलामुळे केस तुटत नाहीत.

‘हे’ लक्षात ठेवा

पाणी खूप कडक असेल आणि त्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांचे प्रमाण जास्त असेल तर ते केसांना निर्जीव बनवू शकते. यामुळे केस गुंतागुंतीचे आणि कोरडे होऊ शकतात. अशावेळी ही समस्या टाळण्यासाठी केस धुतल्यानंतर कंडिशनरचा वापर करावा. आवश्यक असल्यास, आपण फिल्टर केलेले किंवा उकडलेले पाणी देखील वापरू शकता.

केस गळण्याचे खरे कारण आपल्या शरीरात आहे, बाह्य गोष्टी नाहीत. जर आपले केस जास्त प्रमाणात गळत असतील तर हे आपल्या शरीरात लोह, व्हिटॅमिन डी किंवा बायोटिनची कमतरता असल्याचे लक्षण असू शकते. यासाठी सकस आहार घेणे आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच....
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका.
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर...
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर....
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी.
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी...
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी....
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच.
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार.....
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार......
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात...
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात....