AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्यांच्या या गोष्टी अजिबात वापरू नका, अन्यथा तुमचे वाईट दिवस सुरू झालेच म्हणून समजा

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कोणाच्या वस्तू वापरत असाल तर तुम्हाला काही समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे इतरांच्या वस्तू वापरल्यास त्यांची नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येते. त्यामुळे शक्यतो इतरांच्या वस्तू वापरणे टाळावे. जाणून घेऊ वास्तुशास्त्रानुसार इतरांच्या कोणत्या वस्तू वापरणे निश्चित आहे.

दुसऱ्यांच्या या गोष्टी अजिबात वापरू नका, अन्यथा तुमचे वाईट दिवस सुरू झालेच म्हणून समजा
दुसऱ्यांच्या या गोष्टी अजिबात वापरू नकाImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jan 22, 2025 | 2:02 PM
Share

हिंदू धर्मात वास्तुशास्त्र केवळ दिशानिर्देशनाचे महत्त्व सांगत नाही तर एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील नियमानबद्दल देखील सांगते. आपल्या समाजात अनेकांना अशी सवय असते की ते इतरांकडून वस्तू घेतात आणि त्या वापरतात. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार अशा प्रकारे इतरांच्या वस्तू घेणे आणि देणे अशुभ मानले जाते. जे लोक इतरांकडून वस्तू घेतात आणि स्वतः वापरतात त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. माणसाच्या आत नकारात्मक ऊर्जा प्रवेश केल्यामुळे त्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

वास्तुशास्त्राच्या नियमानुसार जेव्हा काही लोक एकमेकांच्या वस्तूंची देवाण-घेवाण करतात. तेव्हा एकमेकांची ऊर्जा देखील त्यांच्यामध्ये प्रवेश करते. या नकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीला अनेक नवीन समस्यांना सामोरे जावे लागते. वास्तुशास्त्रानुसार अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या देवाण-घेवाण करणे टाळल्या पाहिजे ते जाणून घेऊ.

दागिन्यांची देवाण-घेवाण

पूजा, धार्मिक कार्यक्रम, लग्न या समारंभामध्ये अनेक महिला त्यांच्या कपड्यांची जुळणारे दागिने घालतात. मात्र ते आपल्याकडे नसल्यास दुसरे कोणाचे तरी घेऊन ते घालतात. वास्तुशास्त्रात दुसऱ्याचे दागिने घेऊन ते घालणे निशिद्ध मानले गेले आहे. याचा ग्रहांवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे परिधान करणाऱ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.

मीठ

वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर मीठ कधीही कोणाला देऊ नये किंवा कोणाकडून ते घेऊ नये. वास्तुशास्त्रानुसार कोणाला मीठ दिल्यास घरातून सुख-समृद्धी निघून जाते.

बूट चप्पल बदलणे

वास्तुशास्त्रात बूट आणि चप्पल यांची देवाण-घेवाण करणे अशुभ मानले जाते. दुसऱ्याचे बूट किंवा चप्पल कधीही घालू नये. जे लोक दुसऱ्याचे बूट आणि चप्पल घालतात त्यांच्या आयुष्यात गरिबी येते. तसेच इतरांची नकारात्मक ऊर्जा देखील स्वतःमध्ये शोषली जाते.

कंगवा

अनेक जण इतरांनी वापरलेला कंगवा वापरतात. पण या सवयीमुळे आरोग्याला नुकसान होतेच पण त्यासोबतच ती वस्तू असणाऱ्याची नकारात्मक ऊर्जा येते.

पेन आणि पुस्तकाची देवाणघेवाण

पुस्तक आणि पेन यातून ज्ञान मिळते. वास्तुशास्त्रानुसार कधीही पुस्तक कोणाला देऊ नये. पुस्तक दिल्याने ज्ञान मिळवण्यास अडथळे निर्माण होतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.