AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिकाम्या पोटी व्यायाम करावा की करू नये?; तुम्हाला तरी माहीत आहे काय?

रिकाम्या पोटी व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे चरबी जळणे, इन्सुलिन संवेदनशीलता वाढवणे आणि वाढीचा हार्मोन वाढवणे आदी फायदा होतो. हृदयाच्या आरोग्यासाठीही रिकाम्या पोटी व्यायाम करणे फायदेशीर आहे आणि त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. तथापि, काही तोटे देखील आहेत, म्हणून व्यायामापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

रिकाम्या पोटी व्यायाम करावा की करू नये?; तुम्हाला तरी माहीत आहे काय?
रिकाम्या पोटी व्यायाम करावा की करू नये?Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 23, 2024 | 3:16 PM
Share

शरीर निरोगी आणि उत्साहवर्धक ठेवण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. व्यायामामुळे केवळ शरीरच निरोगी राहत नाही तर मानसिक आरोग्यही उत्तम राहतं. व्यायामामुळे हृदयाचं आरोग्य, रक्ताभिसरण, मानसिक आरोग्य आदींवर चांगला प्रभाव पडतो. यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात. तसेच, डायबेटीस, रक्तदाब, चिंता, अशा दीर्घकाळ टिकणाऱ्या आजारांचे धोके कमी होतात. असं असलं तरी व्यायामाशी संबंधित अनेक शंका आहेत. रिकाम्या पोटी व्यायाम करणे चांगले आहे का? रिकाम्या पोटी व्यायाम करणे खूप फायदेशीर असू शकते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. रिकाम्या पोटाने व्यायाम करण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे :

फॅटला ऊर्जा बनवण्यास मदत

बराच काळ काही न खाल्ल्यानंतरच आपण सकाळी व्यायाम करतो. या वेळी, आपल्या यकृत आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजन स्टोअर कमी असतो. त्यामुळे शरीर चरबीला ऊर्जा स्त्रोत म्हणून वापरण्यास प्रवृत्त करते. फास्टिंग व्यायामामुळे चरबीत ऑक्सिडेशन वाढवण्याची क्षमता असते. यामुळे शरीरातील चरबी कमी होते किंवा शरीराची रचनाच सुधारण्यासाठी उपयुक्त होते.

संवेदनशीलता वाढवते

अनशापोटी व्यायाम केल्याने इन्सुलिनसाठी शरीराची संवेदनशीलता वाढते. यामुळे पेशी ग्लुकोज अधिक प्रभावीपणे शोषू शकतात. हे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि टाइप 2 डायबिटीजचे धोके कमी करण्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरते. इन्सुलिन संवेदनशीलतेचे वाढणे शरीराला पोषण अधिक प्रभावीपणे प्रक्रियाबद्ध करण्यास मदत करते.

हार्मोन वाढवते

रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने वाढीचा हार्मोन वाढतो. या हार्मोनचा स्नायूंच्या आरोग्यावर, चरबीच्या रासायनिक बदलांवर आणि एकंदर आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. वाढीच्या हार्मोनचे उच्च स्तर स्नायूंची वाढ सुधारण्यासाठी, चरबी कमी करण्यासाठी आणि व्यायामानंतर ऊर्जा लवकर मिळवण्यासाठी मदत करते.

उर्जा वाढते

सकाळी व्यायाम केल्याने शरीरातील ग्लायकोजन राखून ठेवण्यास मदत होते. व्यायामादरम्यान चरबीचा वापर केला जातो. भविष्यात शरीराची ऊर्जा राखण्यासाठी हे मदत करते. यामुळे क्रीडापटू आणि फिटनेस प्रेमी हे व्यायाम नियमितपणे करतात.

वजन कमी होते

रिकाम्या पोटाने व्यायाम केल्याने गॅलेरीनसारखे भुकेचे हार्मोन्स नियंत्रित होतात, ज्यामुळे दिवसभरात आपल्याला भुकेची भावना कमी होते.

हृदयाचे आरोग्य

जलद चालणे, जॉगिंग किंवा सायकलिंगसारख्या व्यायामामुळे हृदयाच्या आरोग्याला उत्तेजन मिळते. यामुळे लिपिड प्रोफाइल सुधारते, ट्रायग्लिसराइड्स कमी करतात आणि एचडीएल (चांगला कोलेस्ट्रॉल) वाढवतो, त्यामुळे हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो.

अ‍ॅड्रेनलिन आणि एंडोर्फिनचे प्रमाण वाढते

जलद व्यायामामुळे अ‍ॅड्रेनलिन आणि एंडोर्फिनचे प्रमाण वाढते, जे मानसिक स्पष्टता आणि मूड वाढवते. यामुळे संपूर्ण दिवसभर जास्त ऊर्जा आणि ताजगी अनुभवता येते.

(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.