AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जखम झाल्यास हे उपाय थांबवतील रक्तस्त्राव, डॉक्टरांकडे जाण्याची देखील पडणार नाही गरज

घरात काम करत असताना लहान मुलांचे हात किंवा पाय कापले जातात. खेळताना पडल्यामुळे लहान मुलांना गुडघ्यांना किंवा कोपऱ्यांना जखम होणे हे अगदी सामान्य आहे. पण यामुळे रक्तस्त्राव सुरू होतो. अशावेळी घरात उपलब्ध असलेल्या वस्तू वापरून तुम्ही रक्तस्त्राव त्वरित थांबवू शकता.

जखम झाल्यास हे उपाय थांबवतील रक्तस्त्राव, डॉक्टरांकडे जाण्याची देखील पडणार नाही गरज
| Edited By: | Updated on: Jan 20, 2025 | 3:27 PM
Share

स्वयंपाक घरात काम करताना चाकूने कापले जाणे काच किंवा कोणतेही तीक्ष्णू वस्तू पायात अडकणे. यासारख्या घटना बहुतेक घरांमध्ये घडतात. त्याचबरोबर मुलं ही खोडकरपणा करत असतात आणि रोज कुठून ना कुठून जखमी होऊन येतात. प्रथमोपचाराच्या गोष्टी नेहमीच घरी उपलब्ध नसतात किंवा लगेच डॉक्टरांकडे घेऊन जाणे देखील शक्य नसते. त्यामुळे प्रथम घरी रक्तस्त्राव थांबवण्यासाठी उपाय करणे महत्त्वाचे आहे. घरामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या जखमेतून होणारा रक्तस्त्राव थांबवण्यास प्रभावी ठरतात. काही दुखापत झाली असेल तर डॉक्टरांना दाखवणं गरजेचे आहे. परंतु जर छोटी जखम असेल तर रक्तस्त्राव ताबडतोब थांबवण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात आणि जास्त काळजी करण्याची गरज देखील नसते. जाणून घेऊ स्वयंपाक घरातील कोणत्या गोष्टींमुळे जखमेतून होणारा रक्तस्त्राव थांबू शकतो.

हळद

भारतातील प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये हळद असतेच. जखम झाल्यावर त्यावर लगेच हळद पावडर लावल्यास रक्तस्त्राव थांबतो आणि अँटिसेप्टिक म्हणूनही हळद काम करते. मुका मार लागला असेल तर मोहरीच्या तेलात हळद शिजवून लागलेल्या ठिकाणी लावा आणि त्यावर पट्टी बांधा यामुळे कमी वेळात खूप आराम मिळतो. दुखापतीमुळे होणारे दुखणे आणि सूज यापासून आराम मिळवून देण्यासाठी हळदीचे दूध पिल्याने देखील आराम मिळतो.

बर्फ

काही कापले असेल किंवा छोटेशी दुखापत झाली असेल तर सर्वप्रथम त्या भागावर एक सुती कपडा किंवा कापूस ठेवा. ज्यामुळे रक्तस्त्राव वेगाने होणार नाही. यानंतर जखमेवर बर्फाचा तुकडा काही काळ ठेवा आणि हे काही वेळ तसेच करत रहा. दोन ते तीन मिनिटात रक्तस्त्राव थांबेल.

साखर

लहान मुले बऱ्याचदा तोंडावर पडतात आणि दात त्यांच्या ओठांवर लागतो आणि त्यानंतर रक्तस्त्राव होतो किंवा हिरड्यांना दुखापत होतो. अशा परिस्थितीत मुलांना थोडी साखर खायला द्या. यामुळे रक्तस्त्राव कमी होतो आणि मग डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कोरफडीचा गर

कोरफड ही केवळ त्वचा आणि केसांसाठी उत्तम घटक नसून तर ती जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी तसेच काही कापल्या गेल्यावर देखील प्रभावी ठरते. कोरफडीचा गर कापलेल्या ठिकाणी आणि भाजलेला ठिकाणी लावता येतो यामुळे जळजळ होण्यापासून आराम मिळतो. सूज आल्यावर देखील कोरफडीचा गर गरम करून लावल्याने आराम मिळतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.