AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हात धुतल्यानंतर मॉइस्चराइज करणं जरुरी, वाचा काय कारण?

कोरोनामुळे आपल्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. त्यामध्ये आपल्या सर्वांना हात धुण्याची जास्त सवय लागली आहे.

हात धुतल्यानंतर मॉइस्चराइज करणं जरुरी, वाचा काय कारण?
| Updated on: Mar 17, 2021 | 10:26 AM
Share

मुंबई : कोरोनामुळे आपल्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. त्यामध्ये आपल्या सर्वांना हात धुण्याची जास्त सवय लागली आहे. आपण हात वेळोवेळी धुतल्याने हातावरील जंतूंचा नाश होता. परंतु यामुळे आपली त्वचा जास्त कोरडी पडते आणि त्वचेचा ओलावा नाहीसा होतो. परंतू सध्या असलेल्या परिस्थितीमुळे आपण हात धुणेही बंद करू शकत नाहीत. चला तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हात वारंवार हात धुतल्यानंतर आपण आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी. (Moisturize your hands after washing Know the reason)

-हात धुतल्यानंतर शक्यतो मॉइश्चरायझिंग केले पाहिजे. कारण मॉइश्चरायझिंग आपल्या त्वचेच्या ओलावा संतुलित करण्यास मदत करते आणि त्यांना कोमल आणि हायड्रेटेड ठेवते. त्वचेवर पुरळ, खाज सुटणे आणि कोरडेपणा टाळण्यासाठी आपण आपले हात मॉइश्चरायझिंग केले पाहिजे. साबणामध्ये वापरले जाणारे रसायने केवळ जंतुनाशकांना ठार मारत नाहीत तर वारंवार साबणाने हात धुतल्याने हात कोरडे पडतात. कमीतकमी रसायने आणि क्लींजिंग गुणधर्मांसह आपण आपल्या त्वचेसाठी योग्य मॉश्चरायझिंग क्रीम निवडणे देखील महत्वाचे आहे.

-उन्हाळ्यात शरीराला भरपूर पाण्याची गरज असल्याने खूप पाणी प्यायले जाते. परंतु, हिवाळ्यात थंडीमुळे तहान कमी लागते आणि कमी पाणी शरीरात जाते. परंतु हे त्वचेसाठी घातक ठरते. हिवाळ्यातही हवा कोरडी असल्याने शरीराला अधिक पाण्याची गरज असते. कोरड्या हवामानामुळे शरीरातील पाणी कमी होते. अशा परिस्थितीत, शरीरात ओलावा टिकवण्यासाठी आपण जास्तीत जास्त पाणी पिणे महत्वाचे आहे. या दिवसांत दर तासाला एक ग्लास पाणी प्यायले पाहिजे.

-अंघोळीच्या दहा मिनिटे अगोदर पूर्ण शरीरावर नारळाचे किंवा बदामाचे तेल लावून मालिश करा. यामुळे त्वचा कोमल आणि सतेज बनेल. याला दुसरा पर्याय म्हणजे आंघोळीच्या पाण्यात ऑलिव्ह ऑईल किंवा आपल्या आवडत्या कोलनचे काही थेंब टाकून अंघोळ करणे. अंघोळीसाठीचे पाणी जास्त गरम नसावे. गरम पाणी त्वचेचा नरमपणा काढून घेते आणि त्वचेला जास्त शुष्क बनवते. कारण गरम पाण्याने स्नान केल्यामुळे प्राकृतिक तेल नष्ट होते. अंघोळीच्या पाण्यात दोन टीस्पून मध घातल्याने त्वचा मुलायम राहण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Diabetes Diet : मधुमेहाचे रुग्णांनी हे फळ खाल्ल्यास होतील फायदे, शुगर नियंत्रणात राहिल

(Moisturize your hands after washing Know the reason)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.