AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : ऐकावे जनाचे करावे… वजन कमी करण्यासंदर्भातील या 5 मिथकांना भुलू नका !

Weight loss Myths : असे बरेच लोक आहेत ज्यांना असे वाटते की फळांचे सेवन केल्याने वजन कमी होते. हे वजन कमी करण्याशी संबंधित एक मिथकच आहे. अशी अनेक मिथके वेट लॉसशी जोडलेली आहेत.

Weight Loss : ऐकावे जनाचे करावे... वजन कमी करण्यासंदर्भातील या 5 मिथकांना भुलू नका !
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 07, 2023 | 9:07 AM
Share

नवी दिल्ली : वजन कमी करणं (weight loss) हे काही खायचं काम नाहीये असं बरेच लोक म्हणतात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आपण अनेक पद्धतींचा अवलंब करतो. महागडे डाएट प्लॅन्स (diet plans) आणि कठोर वर्कआउटच्या (heavy workout) नवनव्या पद्धतींचा अवलंब करणे सामान्य आहे. काही लोकं तर सोशल मीडियावरील काही व्हिडीओ किंवा पोस्ट्स पाहून तेच डाएट किंवा रूटीन फॉलो करू लागतात. पण वजन कमी करण्यासाठी तसेच चांगल्या आरोग्याशी संबंधित कोणतीही दिनचर्या अवलंबण्यापूर्वी, तज्ञांचा सल्ला घेणे (advice of experts) आवश्यक आहे. स्वत:च्याच मनाने काही उपाय करू नयेत.

असे बरेच लोक आहेत ज्यांना असे वाटते की फळांचे सेवन केल्याने वजन कमी होते. हे वजन कमी करण्याशी संबंधित एक मिथकच आहे. अशी अनेक मिथके वेट लॉसशी जोडलेली आहेत, ज्यावर लोकं सहज विश्वास ठेवतात. अशाच काही मिथकांबद्दल किंवा गैरसमजाबद्दल जाणून घेऊया, जे नुकसान होण्यासही कारणीभूत ठरू शकतात. तुम्हीसुद्धा वेट लॉसच संदर्भातील या गैरसमजुतींवर विश्वास ठेवत नाही ना ?

डिटॉक्सिफाय करणे आहे उत्तम

आजकाल लोक शरीर डिटॉक्स करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात. या लोकप्रिय ट्रेंडमुळे वजन जलदरित्या कमी होते हेही एक मिथक आहे. डिटॉक्सिफायिंगद्वारे, शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात पण जमा झालेली चरबी कमी होत नाही. त्यामुळे या पर्यायाचा अवलंब करून वजन कमी होत नसते.

हर्बल टीमुळे वजन होते कमी

व्हिडिओ आणि ट्रेंडसाठी किंवा शो ऑफ करण्यासाठी अनेक लोक हर्बल टी पिण्यास सुरुवात करतात. त्याच्यामुळे पोटात साठलेली चरबी कमी होऊ लागते असा भ्रम पसरवला जातो. हर्बल टी हा मेटाबॉलिज्म म्हणजेच चयापचय नियंत्रित करण्यास आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. हर्बल टी पिणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्यामुळे वजन कमी होऊ शकते, असा भ्रम मनात बाळगणे हे चुकीचे आहे.

वजन कमी करायचे असेल तर स्नॅक्स खाऊ नयेत

स्नॅक्स खाल्ल्याने वजन कमी होण्यात अडचण येते, असे अनेक लोकांना वाटत असते. परंतु तसे नाही. जर तुम्ही केटो डाएट सारख्या आरोग्यदायी दिनचर्येचे पालन करत असाल तर त्यात भाजलेले ड्रायफ्रुट्स खाऊ शकता, पण त्याचे प्रमाण मर्यादित असावे.

पाण्यामुळे कमी होते वजन

अधिकाधिक पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते, हा संभ्रमही लोकांमध्ये आहे. पाणी प्यायल्याने भूक लागत नाही हे खरे आहे, पण जास्त पाणी प्यायल्याने आरोग्याला हानी पोहोचते. वजन कमी करायचं असो किंवा नसो, प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात ठराविक प्रमाणातच पाणी प्यावं.

फळं खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते

हेल्दी डाएटसाठी आहारात फळांचा समावेश करणे चांगलं आहे, हे खरं आहे. पण वजन कमी करण्यासाठी रूटीनमध्ये केवळ त्यावर अवलंबून राहणे ही मोठी चूक आहे. फळांमध्ये फायबर असते जे पचन सुधारू शकते, परंतु त्यामुळे वजन लवकर कमी होईल, हे ही एक मिथक आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.