मुंबईजवळील ‘या’ हिल स्टेशन्सना भेट देण्याचा करा प्लॅन, ट्रिप राहील संस्मरणीय
तुम्हाला जर तुमच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुंबईजवळील एखाद्या शांत आणि सुंदर हिल स्टेशनला भेट द्यायचे असेल, तर तुम्ही या सुंदर ठिकाणांना फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. येथे तुम्हाला निसर्गाच्या सौंदर्यात शांततेत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

रोजच्या त्याच त्या धकाधकीच्या धावपळीपासून दूर जाऊन शांत ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. अशातच मुलांना देखील उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा तुमच्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत शांत ठिकाणी किंवा हिल स्टेशनवर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आता तुम्हाला लांब जाण्याची गरज भासणार नाही. कारण तुम्ही जर स्वप्नांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत राहत असाल तर तुम्ही जवळच्या सुंदर हिल स्टेशन्सना भेट देऊ शकता. येथील नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण तुमचे मन मोहून टाकेल आणि तुम्हाला येथे काही शांत क्षण घालवण्याची संधी मिळेल.
मुंबईजवळील या हिल स्टेशनवर तुम्हाला ट्रेकिंग आणि इतर अनेक ॲक्टिव्हिटी करण्याची संधी देखील मिळू शकते. तसेच, जर तुम्हाला नेचर फोटोग्राफी करण्याची आवड असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. तुम्ही तुमच्या मित्रासोबत व परिवारासोबत इथे भेट देण्याचा प्लॅन करू शकता.
कर्जत
कर्जत हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक सुंदर शहर आहे. तर कर्जत हे शहर मुंबईपासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर आहे. येथील हिरवळ आणि सुंदर हिल स्टेशन तुमचे मन जिंकतील. येथे तुम्हाला ट्रेकिंग, रॅपलिंग, व्हाईट वॉटर राफ्टिंग आणि व्हॅली क्रॉसिंग सारख्या अनेक ॲडवेंचर ॲक्टिव्हीटी करण्याची संधी मिळू शकते. येथे तुम्ही उल्हास व्हॅली, भोर घाट, कोंढाणा लेणी, पेठ किल्ला कर्जत आणि इतर अनेक ठिकाणे पाहू शकता. मुंबईहून इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला 1 ते 2 तास लागतील.
माथेरान
मुंबईच्या जवळच्या हिल स्टेशनमध्ये माथेरानचे नाव देखील समाविष्ट आहे. येथे तुम्हाला शहराच्या धावपळीपासून दूर काही शांत क्षण घालवण्याची संधी मिळू शकते. या ठिकाणी 33 व्ह्यु पाईंट आहेत, त्यापैकी पॅनोरमा पॉइंट सर्वात लोकप्रिय आहे. येथून तुम्ही आजूबाजूच्या हिरव्यागार दृश्याचा आनंद घेऊ शकता. याशिवाय, लुईसा पॉइंट आणि हार्ट पॉइंट देखील येथील खूप प्रसिद्ध आहेत. इथे इको पॉइंटवर तुम्हाला तुमचा आवाज ऐकू येतो, जो एक वेगळा अनुभव आहे.
माळशेज घाट
माळशेज घाट हे खूप सुंदर ठिकाण आहे. मुंबईपासुन 127 किमी अंतरावर आहे. येथील सुंदर आणि आकर्षक ठिकाणे तुमचे मन जिंकतील. माळशेज धबधबा हे येथील खूप लोकप्रिय ठिकाण आहे, विशेषतः पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य शिगेला पोहोचते. याशिवाय, तुम्ही आजोबा टेकडी किल्ला, कोकण कडा, पिंपळगावजोगा धरण आणि हरिश्चंद्र किल्ला यासारखी अनेक सुंदर ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.
आंबोली
आंबोली हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आहे. हे ठिकाण धबधबे आणि हिरव्यागार टेकड्यांसाठी ओळखले जाते. येथील हवामान नेहमीच चांगले असते. येथे तुम्हाला ट्रेकिंग करण्याची संधी मिळेल, त्याशिवाय हे ठिकाण वन्यजीव पाहण्यासाठी परिपूर्ण आहे. जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता. येथे तुम्ही श्री गावकर धबधबा, माधवगड किल्ला, महादेव गड, सनसेट पॉइंट आणि अनेक सुंदर ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.
