Valentine’s Day special | ‘चीन’मुळे झाला होता रतन टाटांचा ब्रेकअप, कारण वाचून तुम्हालाही होईल दुःख!

आई-वडिलांनी घटस्फोट घेतल्यानंतर रतन टाटा यांच्या आयुष्याने एक नवीन वळण गाठले. त्याच्या आजीचा त्यांच्या वैयक्तिक जीवनात मोठा प्रभाव होता.

Valentine’s Day special | ‘चीन’मुळे झाला होता रतन टाटांचा ब्रेकअप, कारण वाचून तुम्हालाही होईल दुःख!
रतन टाटा
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 12:33 PM

मुंबई : टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा हे सर्व वयोगटातील लोकांसाठी आदर्श आहेत. रतन टाटा विवाहित नाही, सर्वांना हे माहित आहेत. परंतु, आपणास माहित आहे काय की, त्यांची लव्हस्टोरी देखील अपूर्ण राहिली. रतन टाटा यांनी एका मुलाखतीत आपल्या जीवना विषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या (Valentines week special Ratan Tata Unfinished lovestory).

त्यांच्या ब्रेकअपचे कारण ठरले चीन. चीनचे 1962 युद्ध हे त्यांचे प्रेमसंबंध तुटण्याचे मोठे कारण बनले. आई-वडिलांनी घटस्फोट घेतल्यानंतर रतन टाटा यांच्या आयुष्याने एक नवीन वळण गाठले. त्याच्या आजीचा त्यांच्या वैयक्तिक जीवनात मोठा प्रभाव होता.

पालकांच्या घटस्फोटामुळे निर्माण झाल्या अडचणी

रतन टाटा यांनी गेल्या वर्षी एका मुलाखतीत सांगितले होते की, आपल्या आजीकडे आयुष्यातील अनेक आनंदाचे क्षण घालवले आहेत, तिथेच त्यांना जीवनाचे अनेक आदर्श मिळाले आहेत. रतन टाटाच्या शब्दांत, ‘माझे बालपण खूप आनंददायी होते. परंतु मी व माझे भाऊ जसजसे मोठे होत होतो, तसतसे आईवडिलांच्या घटस्फोटामुळे आम्हाला बर्‍याच अडचणी आणि वैयक्तिक अस्वस्थतेचा सामना करावा लागला. आजकालच्या काळाप्रमाणे त्यावेळी घटस्फोट घेणे फारसे सामान्य नव्हते. पण माझ्या आजीने आम्हाला प्रत्येक शक्य त्या मार्गाने वाढवले.

ते पुढे म्हणाले, ‘जेव्हा माझ्या आईने दुसरे लग्न केले, तेव्हा लगेचच शाळेतील इतर मुले आमच्याबद्दल वाईट बोलू लागले होते.’ याबद्दल सांगताना ते म्हणतात, ‘आम्हाला खूप वाईट शब्द ऐकावे लागले. परंतु, आमच्या आजीने आम्हाला दररोज आपला सन्मान कसा टिकवायचा हे शिकवले, जो आजपर्यंत माझ्या बरोबर आहे.’

आजीने आयुष्य जगण्याचा धडा शिकवला!

या परिस्थितींपासून कसे दूर रहायचे हे आजी सांगितले होते, नाहीतर आम्ही त्याविरुद्ध लढायला सुरुवात केली असती, असे रतन टाटा म्हणतात. नैतिकता आणि चांगल्या आचरणासारख्या गोष्टी शिकवण्याचे श्रेय त्यांनी आजीला दिले आहे. त्यानंतर टाटांनी आपल्या मुलाखतीत दुसर्‍या महायुद्धाचा उल्लेख केला.

ते म्हणाले, ‘मला अजूनही आठवतं आहे की, दुसर्‍या महायुद्धानंतर माझ्या आजीने मला आणि माझ्या भावाला सुट्टीसाठी लंडनला नेले होते. त्यांनी इथे मला शिकवलेला नैतिकतेचा धडा आजपर्यंत माझ्याबरोबर आहे. त्यांची आजी बर्‍याचदा ‘असे म्हणू नका’ किंवा ‘त्याविषयी काहीच बोलू नका’ म्हणायची आणि येथून त्यांना हे समजले की मान हा सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे आणि ही गोष्ट त्यांच्या मनात कायम स्थिरावली आहे (Valentines week special Ratan Tata Unfinished lovestory).

चीनमुळे झाला होता ब्रेकअप

टाटांनी आपल्या मुलाखतीत प्रेम आणि लग्नाबद्दलही बोलले होते. सीएएस-भारत-युद्धामुळे त्याचे संबंध तुटले असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘महाविद्यालयानंतर मी लॉस एंजेलिसमधील एका फर्ममध्ये आर्किटेक्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मी येथे दोन वर्षे काम केले. तो एक चांगला काळ होता, वातावरण देखील सुंदर होते.’

ते पुढे म्हणाले, ‘माझ्याकडे माझी कार होती आणि माझे माझ्या नोकरीवर खूप प्रेम होते. लॉस एंजलिस येथे असताना मी प्रथमच प्रेमात पडलो आणि मी तिच्याशी लग्न करणार होतो. पण त्याच वेळी मी ठरवले होते की, मी थोड्या काळासाठी भारतात परतेन. कारण, मी गेल्या बऱ्याच काळापासून माझ्या आजीपासून दूर होतो आणि सात वर्षांपासून तिची तब्येतही खूपच खराब होती.’

टाटा पुढे म्हणाले, ‘म्हणून मी आजीकडे परत आलो आणि मला वाटले की, ज्या व्यक्तीवर मी प्रेम करतो तिने माझ्याशी लग्न करावे व भारतात यावे. पण 1962मध्ये भारत-चीन युद्धामुळे तिच्या पालकांनी या लग्नाला संमती दिली नाही. आपल्या मुलीने असे पाऊल उचलण्याची त्यांची इच्छा नव्हती आणि यामुळेच आमचा संबंध कायमचा संपला.’

आपला मुलगा अभियंता व्हावा, अशी वडिलांची इच्छा होती!

टाटा म्हणाले की, कोण बरोबर होते किंवा चूक कोण हे सांगणे फार कठीण आहे. त्यावेळी मला व्हायोलिन वाजवायचे होते, पण माझ्या वडिलांचा आग्रह असा होता की, मी पियानो शिकू. मला अमेरिकेत महाविद्यालयात जायचे होते पण, ते म्हणाले की यूके. मला आर्किटेक्ट व्हायचे होते, पण मी अभियंता व्हावे, अशी त्यांची इच्छा होती.

(Valentines week special Ratan Tata Unfinished lovestory)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.