AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईव्हीएमच्या वादात आता अभिजीत बिचुकलेंची उडी, थेट पंतप्रधान मोदींना चॅलेंज, म्हणाले मी पवारांच्या पाठिमागे उभा त्यांनी..

ईव्हीएमवरून सुरू असलेल्या वादात आता अभिजीत बिचुकले यांनी देखील उडी घेतली आहे, यावरून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

ईव्हीएमच्या वादात आता अभिजीत बिचुकलेंची उडी, थेट पंतप्रधान मोदींना चॅलेंज, म्हणाले मी पवारांच्या पाठिमागे उभा त्यांनी..
| Updated on: Dec 08, 2024 | 8:20 PM
Share

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठा फटका बसला होता. महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली.  या पराभवातून सावरत महायुतीनं विधानसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन केलं. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. तब्बल 231 उमेदवार विजयी झाले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र मोठा फटका बसला. महाविकास आघाडीचे तीन प्रमुख घटक पक्ष मिळून केवळ 50 जागाचं जिंकता आल्या. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहेत. या वादात आता अभिजी बिचुकले यांनी देखील उडी घेतली आहे. ईव्हीएमवरून त्यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले अभिजीत बिचुकले?   

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रभू श्रीरामाला स्मरून सांगावं की ईव्हीएममध्ये घोटाळा नाही, असं आव्हान बिचुकले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ईव्हीएममध्ये घोटाळा झाला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोर येऊन सांगावं की ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा नाही. शरद पवार साहेबांचा एवढा दारून पराभव महाराष्ट्रात होऊ शकत नाही. पवार साहेबांनी यावर ठोस पाऊल उचलावं मी पवार साहेबांच्या मागे उभा आहे. शरद पवारांना ईव्हीएम विरोधात आंदोलनासाठी माझा पाठिंबा आहे. यासाठी पवार साहेबांनी धाडसी पाऊल उचलावं, मी पवार साहेबांचा पाठीराख म्हणून मागे उभा राहील असं बिचकुले यांनी म्हटलं आहे.

बारामतीमध्ये मला 200 मतं पडायला हवी होती, पण मला केवळ 92 च मते कशी मिळाली असा सवालही यावेळी अभिजित बिचुकले यांनी उपस्थित केला आहे.  राज्याला खऱ्या अर्थाने स्टारडम मी दिलं, लोक माझ्यासोबत फोटो काढायला गर्दी करतात मग माझी मतं जातात कुठं, असंही यावेळी बिचकुले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी सादर करत सवाल केला आहे. काँग्रेसला 80 लाख मतं पडली पण त्यांचे 16 च आमदार निवडून आले, मात्र शिवसेना शिंदे गटाला 79 लाख काँग्रेसपेक्षा एक लाख मतं कमी पडली तरी त्यांचे 57 आमदार निवडून आले असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.