AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे, शिवसेना ठाकरे गट युतीबाबत काय वाटतं? आदित्य ठाकरे मनातलं बोलले

विजयी मेळाव्यानंतर राज्यभरात मनसे आणि ठाकरे गट युतीची जोरदार चर्चा सुरू आहे, यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनसे, शिवसेना ठाकरे गट युतीबाबत काय वाटतं? आदित्य ठाकरे मनातलं बोलले
aaditya thackeray
| Updated on: Jul 13, 2025 | 7:56 PM
Share

मुंबईमध्ये पाच जुलैला विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधूंची शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उपस्थिती होती. तब्बल वीस वर्षानंतर या मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युतीची चर्चा चांगलीच रंगली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमंक काय म्हणाले आदित्य ठाकरे?

सध्या महाराष्ट्रात वातावरण आहे, दोन्ही भावाने एकत्र यावे यासाठी वातावरण आहे. यावर चर्चा होईल, पण हे सेंटिमेंट महाराष्ट्र हिताचं आहे.  महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

जनसुरक्षा विधेयकावर प्रतिक्रिया  

दरम्यान नुकतीच जनसुरक्षा विधेयकाला मंजुरी मिळाली आहे, यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ते म्हणतात की डावी विचारसरनी , पण ज्या देशात 80 टक्के लोक राशेन वर राहतात, ते सरकार कोणत्या विचारसरणीचे आहे डावं की उजवं? असा सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

ज्या योजना आपण काढतो त्या लेफ्टिंग आहेत,  सध्या संविधानाला धोका निर्माण झाला आहे. भाजपचेच खासदार आहेत ते संविधान विरोधी आहेत.  त्यांच्यावर हे कारवाई करणार आहेत का? आतापर्यंत ज्या कारवाया झाल्या त्या कोणत्या कायद्यांतर्गत केल्या?  जे अतिरेकी, नक्षलवादी असतील त्यांना सोडायचं नाही,  पण या कायद्यात जनसुरक्षा हित नाही, ते जे आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला आम्ही विरोध करत आहोत. यामुळे मीडियाचे सुद्धा स्वातंत्र्य निघून गेले आहे, अशी टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान उद्यापासून मनसेच्या शिबिराला इगतपुरीमध्ये सुरुवात होणार आहे. या मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे काय बोलणार? काय भूमिका घेणार? युती संदर्भात काही बोलणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.