AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाडीचा चक्काचूर, मदतीसाठी कोणीच पुढे येईना, लोक व्हिडीओ काढत राहिले अन् अचानक… तरुणांसोबत नेमकं काय घडलं?

नवापूर महामार्गावर भीषण अपघातात मृत्यूच्या दारात असलेल्या ३ तरुणांना ॲड. अविनाश पाटील यांनी स्वतःच्या कारमधून दवाखान्यात नेले. त्यांच्या या समयसूचकतेमुळे तरुणांचे प्राण वाचले असून RTO कडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

गाडीचा चक्काचूर, मदतीसाठी कोणीच पुढे येईना, लोक व्हिडीओ काढत राहिले अन् अचानक... तरुणांसोबत नेमकं काय घडलं?
Nandurbar Highway Accident
| Updated on: Jan 08, 2026 | 3:26 PM
Share

माणुसकीचा ओलावा हरवत चाललेल्या काळात नंदुरबारच्या नवापूर महामार्गावर एका वकिलाने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. भीषण अपघातात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आणि मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या धुळ्याच्या तीन तरुणांना शिरपूरचे ॲडव्होकेट अविनाश पाटील यांनी स्वतःच्या खाजगी वाहनातून रुग्णालयात पोहोचवून जीवदान दिले. त्यांच्या या समयसूचकतेची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी घेत त्यांना २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरविले आहे.

नेमकं काय घडलं?

नवापूर शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अपेक्स हॉटेलजवळ आयशर टेम्पो आणि मालवाहू ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की वाहनांचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता. या अपघातात धुळे येथील रहिवासी असलेले योगेश राजेंद्र माळी, राकेश भील आणि आजेश हे तिघे तरुण गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. ते मदतीसाठी याचना करत होते. यावेळी महामार्गावर मोठी गर्दी जमली होती. अनेकजण मोबाइलमध्ये व्हिडीओ काढण्यात मग्न होते, पण मदतीसाठी कोणीही जात नव्हते.

त्याच वेळी शिरपूरचे रहिवासी असलेले ॲड. अविनाश पाटील हे आपल्या खाजगी कामानिमित्त या मार्गावरून जात होते. गर्दी आणि अपघात पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली कार थांबवली. जखमींची गंभीर अवस्था पाहून त्यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता लोकांच्या मदतीने तिघांनाही आपल्या आलिशान कारच्या मागील सीटवर घेतले. स्वतःच्या गाडीच्या सीटला रक्त लागेल, याचा जराही विचार न करता त्यांनी गाडी नवापूर उपजिल्हा रुग्णालयाकडे वेगाने वळवली.

तिन्ही तरुणांचे प्राण वाचले

दवाखान्यात पोहोचल्यानंतर त्यांनी स्वतः डॉक्टरांना विनंती करून तातडीने उपचार सुरू करण्यास सांगितले. त्यांना वेळीच उपचार मिळाल्याने या तिन्ही तरुणांचे प्राण वाचले. या अपघाताची माहिती मिळताच नंदुरबारचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) उत्तम जाधव यांनी तातडीने नवापूर रुग्णालय गाठले. ॲड. पाटील यांनी केलेल्या मदतीची माहिती मिळताच जाधव भारावून गेले. शासनाच्या मदत करणारा नागरिक धोरणांतर्गत आणि माणुसकीच्या नात्याने उत्तम जाधव यांनी स्वतःच्या वतीने ॲड. अविनाश पाटील यांना २५,००० रुपयांचे रोख बक्षीस आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.

या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात ॲड. अविनाश पाटील यांच्या संवेदनशीलतेचे आणि धाडसाचे मोठे कौतुक होत आहे. वकिली व्यवसायातून न्याय देणारा हात आज जीव वाचवण्यासाठी धावून आला, अशी चर्चा परिसरात रंगली आहे.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.