मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल मुंबईच्या (Mumbai) शिवाजी पार्कात केलेल्या भाषणाची राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खिल्ली उडवली आहे. राज ठाकरेंना टीका आणि नकलांशिवाय काहीच जमत नाही. एकेकाळी आपले 14 आमदार होते. ते आपल्याला का सोडून गेले, याचे आत्मपरीक्षण करावे, असेही ते म्हणाले. नकला, भाषणं करून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, असा घणाघात त्यांनी केला.