AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के यशासाठी अजित पवार यांची सर्वात मोठी रणनीती, विरोधकांना धोबीपछाड देणार

Lok Sabha Election Maharashtra Politics: महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभरातील लोकसभेच्या ५ जागांवर निवडणूक लढवत आहेत. यामुळे ४२ मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांवर या ठिकाणांची जबाबदारी दिली आहे. तसेच ४२ मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के यशासाठी अजित पवार यांची सर्वात मोठी रणनीती, विरोधकांना धोबीपछाड देणार
ajit pawar
| Updated on: Apr 15, 2024 | 9:18 AM
Share

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील तिन्ही पक्षांचे जागा वाटप निश्चित झालेले नाही. आठ जागांवर अजून एकमत होऊ शकले नाही. त्यात मुंबईतील दक्षिण मुंबईसह तीन जागा आणि ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागा आहेत. परंतु या सर्व जागा भाजप किंवा शिवसेनेच्या आहेत. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पाच जागा लढवणार आहे. या पाचही जागांवर विजय मिळवण्यासाठी अजित पवार यांनी मेगा प्लॅन तयार केला आहे. या रणनीतीनंतर शंभर टक्के विजय मिळण्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात आहे.

कोणत्या पाच जागा लढवणार

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून रायगड, परभणी, बारामती, शिरूर, धाराशिव या पाच जागांवर उमेदवार जाहीर झाले आहे. या पाचही जागा निवडून आणण्याची रणनीती पक्षात तयार झाली आहे. त्यासाठी या ५ लोकसभा मतदार संघामध्ये उर्वरित ४२ लोकसभा मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते हे या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहेत. कार्यकर्त्यांची ही फौज राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयापर्यंत नेणार आहे. प्रत्येक वार्ड आणि प्रत्येक घरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहचणार आहेत.

सर्वांचे लक्ष बारामतीकडे

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभरातील लोकसभेच्या ५ जागांवर निवडणूक लढवत आहेत. यामुळे ४२ मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांवर या ठिकाणांची जबाबदारी दिली आहे. तसेच ४२ मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करणार आहेत. या पाच लढतींमध्ये सर्वाधिक लक्ष बारामतीकडे असणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात आहे. त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे निवडणूक रिंगणात आहे. यामुळे देशभरातील राजकीय निरीक्षकांचेही या लढतीकडे लक्ष लागले आहे.ट

महायुतीचा सस्पेन्स कायमच

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवारीचा तिढा कायम आहे. आता उमेदवारी भरण्यासाठी फक्त ४ दिवस बाकी राहिले आहेत. सुट्यांमुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ चार दिवस आहे. १२ एप्रिल ते १९ एप्रिल पर्यत उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा कालावधी आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीत तीन दिवस सुट्या येत आहेत. या ठिकाणी ७ मे रोजी मतदान होणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडून उद्या विनायक राऊत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.