AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा, राज्यात शुकशुकाट, अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे, त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले, अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली असून, अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा, राज्यात शुकशुकाट, अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद
अजित पवार Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 29, 2026 | 5:37 PM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बुधवारी भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. आज अजित पवार यांच्यावर बारामतीमध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  आपल्या नेत्याला निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी होतं.  दरम्यान अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आज अनेक शहरांमध्ये बाजारपेठा बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पुणे, बीड, छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये आज बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

राज्यात कुठे कुठे बंद? 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  निधनाने संपूर्ण महाराष्ट्र दुःखात आहे. कालपासून सगळीकडे शोकाकुल वातावरण पहायला मिळत आहे. आज छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅनॉट परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेऊन अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.  राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर  करण्यात आला आहे.

इगतपुरीमध्ये बंद 

दरम्यान अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.  इगतपुरीतही व्यापारी संघटनेकडून आज शहरात बंदची हाक देण्यात आलेली आहे. इगतपुरीतील भाजी मंडई कायमच गजबजलेलं असतं मात्र आज मार्केट बंद असल्याने या ठिकाणी शुकशुकाट पहायला मिळत आहे.

माढ्यात बंद 

सोलापूरच्या माढ्यात देखील व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत, सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अहिल्यानगरमधील नेप्ती उपबाजार समिती व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बंद ठेवत, अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

जळगाव जिल्ह्यातही बंद 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे, अजित पवार यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले, दरम्यान आज जळगाव जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद असल्याच्या पहायला मिळाल्या.  मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव शहरात आज बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?