AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 की 6 अजित दादांसोबत विमानात किती लोक?, पायलट जिवंत आहे का? रोहित पवारांनी सगळंच सांगितलं, म्हणाले तो पायलट…

अजित पवारांच्या विमान अपघातातील पायलट जिवंत असल्याच्या अफवांवर रोहित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी त्यांनी अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

5 की 6 अजित दादांसोबत विमानात किती लोक?, पायलट जिवंत आहे का? रोहित पवारांनी सगळंच सांगितलं, म्हणाले तो पायलट...
rohit pawar ajit pawar
| Updated on: Feb 27, 2026 | 12:43 PM
Share

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्यांच्या निधनानंतर या प्रकरणी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशी करावी, त्याबद्दलची एफआयआर नोंदवून घ्यावी अशी मागणी करत आहेत. त्यातच आता रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर रोहित पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

रोहित पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अजित पवारांच्या मृत्यूनंतर देशभरातील जनतेकडून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. काही लोक विमानातील पायलट जिवंत असल्याचे बोलत आहेत, ते कोणत्या तरी देशात आहेत, असेही बोललं जात, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले.

रोहित पवार काय म्हणाले?

अजित दादांचा विमान जे पायलट चालवत होते, ते जिवंत आहेत, असं समजून चालणार नाही. ज्या पायलटची आधी ते विमान चालवण्यासाठी नियुक्ती झाली होती, त्यानंतर मग अचानक ते कॅन्सल झाले. ते पायलट तिथे आहेत. त्यामुळे हा विषय इथे राहत नाही, असे रोहित पवार म्हणाले.

या विमानात जे कोणी पायलट होते, त्यात दादा होते, असेंडेट माळी ताई होत्या, जाधव नावाचे सिक्युरिटी होते, पाठक नावाच्या को पायलट आणि कपूर नावाचे मेन पायलट होते. हे पाचही व्यक्ती दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत. त्यामुळे जर कोणी सांगत असेल ही व्यक्ती जिवंत आहे ती व्यक्ती जिवंत आहे. असं काहीही नाही. अपघात झाला की घातपात झाला याबद्दलची माहिती आपल्याला घ्यायाची आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय, असेही रोहित पवारांनी म्हटले.

राज्यातील जनता दादाला न्याय देणार

महाराष्ट्रात एफआयआर घेतला जात नाही. एफआयआर देणं हा आमचा अधिकार आणि घेणं त्यांचं कर्तव्य आहे. राज ठाकरे मराठी माणसासाठी लढत आले आहेत. राज ठाकरे या विषयाला न्याय देणार आहे. राज्यातील जनता दादाला न्याय देणार आहे. त्यांनी सांगितलं की, विचारायचं कारण नाही. न्याय कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असेही रोहित पवारांनी सांगितले.

Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.