Raj Thackeray : FIR दाखल करून घेण्यात अडथळे का आणले जात आहेत ? राज ठाकरेंचा सरकारला डायरेक्ट सवाल
अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूला एक महिना झाला तरी घातपाताचा संशय कायम आहे. रोहित पवारांनी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो नाकारण्यात आला. यानंतर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंनीही पत्रकार परिषद घेऊन "धुक्याने की धोक्याने?" असा प्रश्न विचारत सरकारला चौकशीत अडथळे का आणले जात आहेत, याबाबत जाब विचारला.

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला 1 महीना होत आला आहे. त्यांच्या विमानाचा अपघात की घातपात झाला असा संशय लोकांच्या मनात असून रोहित पवार यांनी हा मुद्दा सातत्याने लावून धरला आह. या अपघाताच्या चौकशीला झेल्या दिरंगाईमुळेही ते नाराज असून त्यांनी 25 फेब्रुवारीला मुंबईत आणि काल , 26 फेब्रुवारी रोजी बारामतीत येथील पोलिस स्टेशमनमध्ये जाऊन FIR दाखल करण्याचा प्रयत्न केल. मात्र दोन्हीकडे FIR दाखल करून घेण्यास नकार मिळाला. त्या रोहित पवार हे आक्रमक झाले असून त्यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. विविध मुद्दे मांडले.नंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.
रोहित पवार यांची भेट झाल्यानंतर राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत अनेक मुद्यांवर भाष्य केलं. हा अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला हे महाराष्ट्राला समजत नाहीये,असं राज ठाकरे म्हणाले. रोहित पवारांनी सर्व मुद्दे, टेक्निकल गोष्टी सांगितल्या, त्यांचा FIR का दाखल करून घेतला जात नाहीये. चौकशी नीट व्हावी यासाठी एफआयआर करायचा असेल तर अडथळे का निर्माण केले जातात असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. यावरून संशय येण्यास वाव असल्याचे म्हणत त्यांनी सरकारला काही रोखठोक प्रश्नही विचारले.
काय म्हणाले राज ठाकरे ?
हा अपघात झाल्यावर मी कोणालातरी म्हणालो होतो की, अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला, हे समजत नाहीये. आज रोहित पवारांची माझी भेट झाली, त्यांनी काही टेक्निकल गोष्टी सांगितल्या. त्यांच्याशी बोलल्यावर मला एकच गोष्ट जाणवली की, त्यांनी 3 ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केला. पण तिन्ही ठिकाणी सरकारकडून एफआयआर घेतला नाही. मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनला ते गेल्यावर तिथले अधिकारी एफआयआर लिहून घेत होते, टाईप करत होते, पण ते टाईप करत असताचनाच तिथे डीसीपी आले. आणि त्यांनी सांगितलं की एफआयआर लिहून घ्यायचा नाही. हे कशासाठी ? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.
याची उत्तर मिळाली पाहिजेत. जर तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण त्याबद्दल घरच्या लोकांनाच काही संशय असेल. किंवा चौकशी नीट व्हावी यासाठी त्यांना एफआयआर करायचा असेल, तर त्यामध्ये सरकारकडून अडथळे का आणले जात आहेत ? असा थेट सवालही राज ठाकरे यांनी सरकारला विचारला.
काही काळंबेरं आहे का ?
आज सुनेत्रा वहिनी तिथे उपमुख्यमंत्री म्हणून बसल्या आहेत, त्यांनीही यावर विचार केला पाहिजे, कारण त्यांचेच ते पती होते. त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा एफआयआर आहे. आणि एफआयआर घेऊ नका, असा दबाव सरकारकडून येत आहे. कुठेही एफआयआर नोंदवू शकता असं लोकांना सांगितलेलं आहे. पण एफआयआर नोंदवायला गेल्यावर जर त्या माणसासमोर अडथळे आणत असाल तर यात काही काळंबेर आहे का असा संशय निर्माण होतोच ना. सरकारच संशय निर्माण करतंय असा आरोपही राज ठाकरे यांनी केला,
