AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांचा राजीनामा, कारण…

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवणारे काँग्रेसचे अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. बळवंत वानखेडे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांचा राजीनामा, कारण...
| Edited By: | Updated on: Jun 12, 2024 | 8:26 PM
Share

अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. वळवंत वानखेडे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. बळवंत वानखेडे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव केला. त्यामुळे ते अमरावतीचे खासदार झाले. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, आमदार असताना खासदार म्हणून निवडून आल्यानंतर दोन पैकी एका पदाचा राजीनामा द्यावा लागत. त्यामुळे बळवंत वानखेडे यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत दर्यापूर विधानसभा मतदारसंघात बळवंत वानखडे विजयी झाले होते. पण आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात प्रचार केला. तसेच बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदावाराला उभं केलं. त्यामुळे त्याचा थेट फटका हा नवनीत राणा यांना बसला. तर काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांना सर्वाधिक मतं मिळाली. त्यामुळे ते विजयी झाले.

ग्रामपंचायत सदस्य ते खासदार, बळवंत वानखेडे यांचा प्रेरणादायी प्रवास

बळवंत वानखेडे यांनी खासदारकी जिंकताच ते आता कामाला देखील लागले आहेत. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते आता दिल्लीला देखील जाणार आहेत. दिल्लीत संसदेत येत्या 24 जून पासून अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनासाठी बळवंत वानखेडे हे दिल्लीला जाणार आहेत. वळवंत वानखेडे यांचा प्रवास हा ग्रामपंचायात सदस्यपासून सुरु झाला होता. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, सेवा सहकारी सोसायटी सभापती, जिल्हा बँक सदस्य, आमदार आणि आता खासदार असा बळवंत वानखडे यांचा प्रवास राहिलेला आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.