AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दर्ग्यासमोरील दुहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं, पुजाऱ्याची हत्या करण्याचं कारण काय?

भाविकांकडून पैसे घेण्याला विरोध केला म्हणून अन्वर बेग या मुजाची (पुजारीची) हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य एकाला अटक केली आहे.

दर्ग्यासमोरील दुहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं, पुजाऱ्याची हत्या करण्याचं कारण काय?
घरगुती भांडणातून पतीकडून पत्नीची हत्याImage Credit source: t v 9
| Updated on: Sep 20, 2022 | 1:54 PM
Share

सुरेंद्रकुमार आकोडे

अमरावती : दडबडशहा दर्ग्यावर आठ दिवसांपूर्वी मध्यरात्री दुहेरी हत्याकांडाची (double murder case) थरारक घटना घडली. या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. बडनेरा शहरापासून अंदाजे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणी पोलीस स्टेशनच्या (Loni Police Station) हद्दीतील ही घटना. भाविकांकडून पैसे घेण्याला विरोध केला म्हणून अन्वर बेग या मुजाची (पुजारीची) हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य एकाला अटक केली आहे.

या दुहेरी हत्याकांड प्रकरणी लक्ष्मण गोरख पिगळे वय 41 याला अटक करण्यात आली आहे. तो नंदुरबार जिल्ह्यातील तळवे येथील रहिवासी आहे. त्याला हत्येसाठी सहकार्य दीपक पन्ना यानं केलं होतं. दीपक हा अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खडेशवर तालुक्यातील रहिवासी आहे.

15 सप्टेंबर रोजी बडनेरा जवळील शेत शिवारातील दडबडशहा दर्ग्यावर राहणाऱ्या दोघांची निर्घृण हत्या झाल्याची माहिती समोर आली होती. या दर्ग्यावर निवासी असलेला अनवर बेग व तेथेच राहणारा तौफिक शेख राहत होते. मध्यरात्री आरोपींनी या दोघांची हत्या केली होती.

आरोपी गोरख पिगळे हा दहा वर्षांपासून दर्ग्यावर राहत होता. तेव्हा भाविकांकडून पैसे घेत होता. हे मात्र पुजारी असलेल्या अनवर बेगला पटत नव्हते. तो आरोपी लक्ष्मण गोरख पिंगळेला विरोध करायचा. यातून त्यांचे अनेकदा भांडण झाले. यातूनच अनवरची लक्ष्मणने हत्या केली आहे.

भाविकाकडून पैसे कशाला घ्यायचं म्हणून विरोध केला. पण, हीच बाब खटकली. यातून हे हत्याकांड झाल्याच पोलिसांनी उघड केलं. आता दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. खडी फोडल्यावाचून त्यांच्यासमोर पर्याय नाही.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.