AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidarbha Rain : विदर्भात पावसाची बॅटिंग, नाल्याच्या पुरात एक जण वाहून गेला, हवामानाचा अंदाज काय?

शेतकरी जगदीश गिरिपुंजे यांच्याकडे दोन एकर शेती आहे. ती शेती नाल्यापलीकडे आहे. नाल्याच्या पुरातून जात असताना अचानक पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले.

Vidarbha Rain : विदर्भात पावसाची बॅटिंग, नाल्याच्या पुरात एक जण वाहून गेला, हवामानाचा अंदाज काय?
नाल्याच्या पुरात एक जण वाहून गेलाImage Credit source: t v 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Sep 16, 2022 | 2:58 PM
Share

नागपूर :विदर्भात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाची बॅटिंग सुरू आहे. नदी, नाले, तलाव आधीच भरलेत. अशात आणखी पावसानं गेल्या पाच दिवसांपासून ठाण मांडलं. त्यामुळं नदी, नाले दुथळी भरून वाहत आहेत. या पावसामुळं शेतात पाणी जास्त झालं. त्यामुळं पिकं सडून शेतकऱ्यांचं नुकसान (Crop Damage) होत आहे. भंडारा येथील नाल्यात एक ५६ वर्षीय व्यक्ती पुरात वाहून (Washed Away) गेला. नाल्याला आलेल्या पुरात वाहून 56 वर्षीय शेतकऱ्याच्या मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील टांगा येथे घडली. जगदीश नारायण गिरिपुंजे (Jagdish Giripunje) असं वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतात जाताना होता नाला

मोहाडी तालुक्यात 12 व 13 सप्टेंबर अतिवृष्टी झाली. नदी नाल्याला पूर आला. शेतकरी जगदीश गिरिपुंजे यांच्याकडे दोन एकर शेती आहे. ती शेती नाल्यापलीकडे आहे. नाल्याच्या पुरातून जात असताना अचानक पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले. शेतकरी पुरात वाहून गेल्याचे लक्षात येताच याची आंधळगाव पोलिसांना माहिती दिली. शोध मोहीम राबविल्यावर अखेर जगदीश यांचा मृतदेह सापडला.

आणखी तीन दिवस पावसाचा अंदाज

अमरावतीत गेल्या 5 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आज अमरावती शहरासह ग्रामीण भागात तुफान पावसाची बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांची पार दाणादाण उडाली आहे. पुढील तीन दिवस असाच पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे.

सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. धामणगाव रेल्वे , चांदुर रेल्वे गावात घर कोसळले.

गडचिरोलीत पूर ओसरला

गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता, वैनगंगा, इंद्रावती, इराई या चारही नद्यांचा पूर ओसरला. जिल्ह्यातील अनेक मुख्य मार्ग सुरळीत झालेले आहेत. आष्टी गोंडपिंपरी – चंद्रपूर हा मार्ग सुरळीत झाला. आलापल्ली – भामरागड छत्तीसगड हा राष्ट्रीय महामार्ग आणि सुरळीत झालेला आहे.

बिनागुंडा ते लाहेरी महामार्ग बंद

चामोर्शी -गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग पूर ओसल्याने सुरळीत झालेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वाहतूक तीन दिवसानंतर आज सकाळपासून सुरळीत झाली. सध्या गडचिरोली जिल्ह्यातील एक राष्ट्रीय महामार्ग बिनागुंडा ते लाहेरी हा पुरामुळे बंद आहे. गडचिरोली जिल्ह्यात चौथ्यांदा पुराचा फटका बसला.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?