AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांच्या वीज तोडणीविरोधात युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक; अंजनगाव सुर्जीत उंच टॉवरवर विरूगिरी

राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे अशी मागणी देखील या आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, मागणी पूर्ण न झाल्यास आत्महत्येचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या वीज तोडणीविरोधात युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक; अंजनगाव सुर्जीत उंच टॉवरवर विरूगिरी
अंजनगाव सुर्जी येथील टॉवरवर चढलेले स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते.
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 1:12 PM
Share

अमरावती : युवा स्वाभिमानीचे तीन कार्यकर्ते (Youth Swabhiman activists) मातंगपुरा येथील टॉवरवर चढले. राज्य सरकार शक्ती करत आहे. वीज कापून पाणीपुरवठा बंद करत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांवर मरणाची पाळी आली आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार रवी राणा (MLA Ravi Rana), खासदार नवनित राणा (MP Navneet Rana) हे शेतकऱ्यांसाठी लढा देत राहतात. त्यांच्या कार्यातून प्रेरित होईन हे आंदोलन उभारल्याचं या तीन कार्यकर्त्यांचं म्हणण आहे. अजय देशमुख, विठ्ठल ढोले आणि उमेश कोकाटे असे या तीन कार्यकर्त्यांची नाव आहेत. शेतकऱ्यांची वीज कापणे बंद करावे. अन्यथा हे आंदोलन सुरूच राहील. बळजबळीने उतरविण्याचा प्रयत्न केला. तर येथून उड्या घेऊन आत्महत्या करू, असा इशारा या तीन पदाधिकाऱ्यांनी दिली. या आंदोलनाची दखल घ्यावी, असे आवाहन या कार्यकर्त्यांनी केले आहे.

वीज बिल माफ करण्याची मागणी

ज्या शेतकऱ्यांकडे शेतातील कृषी पंपाचे वीज बिल थकीत आहे. अशा शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणी ही महावितरणकडून तोडली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू, हरबरा, कांद्यासह अन्य पिकांना फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, यासाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील एका उंच टॉवरवर चढून महावितरण व राज्य सरकार विरोधात वीरूगिरी आंदोलन सुरू केली आहे. राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे अशी मागणी देखील या आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, मागणी पूर्ण न झाल्यास आत्महत्येचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. ते या कार्यकर्त्यांना उतरविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Nagpur NMC | नदी काठावरील अतिक्रमणाविरुद्ध मोठी कारवाई; न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूरचे मनपा आयुक्त म्हणाले…

Nagpur Corona | नागपूरच्या जिल्हाधिकारी म्हणतात, कोरोनाला गंभीरतेने घ्या; महिनाभरात शंभरावर मृत्यू

Nagpur Police | नागपूर पोलिसांवर कोरोनाचा मोठा आघात; दीडशेच्या वर पोलीस पॉझिटिव्ह, हायजिनीक किटचे वाटप

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.