AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाचा शिक्षा पोहचला पण तांत्रिक अडचणीमुळे शिधा वाटपात येतोय अडथळा

राज्य सरकारने सामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी याकरिता शंभर रुपयात चार वस्तु देण्याचा निर्णय घेतला आहे.

आनंदाचा शिक्षा पोहचला पण तांत्रिक अडचणीमुळे शिधा वाटपात येतोय अडथळा
Image Credit source: Google
| Updated on: Oct 22, 2022 | 5:23 PM
Share

Nashik News : सर्व सामन्यांची दिवाळी गोड (Diwali) करण्यासाठी शिंदे सरकारने ( Shinde Goverment) आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शंभर रुपयात आनंदाचा शिधा देखील मिळत आहे. मात्र, ग्रामीण भागात आनंदाचा शिधा पोहचला असून वाटप करतांना इंटरनेटचा अडथळा येत असल्याच्या बाबी समोर येत आहे. शहरी भागात ही प्रकिया सुरळीत सुरू असून ग्रामीण तसेच दुर्गम भागात ईपॉस मशिनला इंटरनेटचे संपर्क क्षेत्र मिळत नसल्याने आनंदाचा शिधा वाटण्यात अडथळा येत आहे. स्थानिक पातळीवर इंटरनेटची येणारी अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात असून त्याला फारसे यश येतांना दिसत नाहीये.

केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारने रेशन दुकानात सर्वसामान्य नागरिकांना विशेषतः पिवळे आणि केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहेत त्यांना लाभ दिला जात आहे.

केंद्र शासनाच्या गरीब कल्याण योजनेत कोरोनापासून बहुतांश नागरिकांना मोफत अन्नधान्य तर काहींना कमी दरात ही सुविधा दिली गेली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील सामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी याकरिता शंभर रुपयात चार वस्तु देण्याचा निर्णय घेतला आहे.

शंभर रुपयात राज्य सरकार खादयतेल, रवा, चनदाळ व साखर या चार वस्तू रेशनदुकानात उपलब्ध करून देत असून त्याला आनंदाचा शिधा असे नाव देण्यात आले आहे.

राज्य सरकारने आनंदाचा शिधा वाटप करत असतांना त्यासाठी टेंडर देखील काढले होते, टेंडर प्रणाली राबवून आनंदाच्या शिधा वाटप केला जात आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात आनंदाचा शिधा पोहचला आहे. 80 टक्के किट रेशन दुकानदारांना प्राप्त देखील झाले असून वाटप सुरू आहे.

परंतु ग्रामीण आणि दुर्गम म्हणजेच आदिवासी भागात इंटरनेटचा अडथळा येत आहे, ईपॉस मशिनला इंटरनेट सेवा मिळत नसल्याने ही अडचण निर्माण होत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.