AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बलात्काराच्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेल्या आसाराम बापूची पुस्तकं शाळेत वाटली, संतप्त पालक..

बलात्काराच्या गुन्ह्यासाठी आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूचा पुळका उरणमधल्या एका शाळेला आला. 'संस्कार सरिता' नावाचे आसाराम बापूचे पुस्तक उरण येथील 'जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट'च्या विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

बलात्काराच्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेल्या आसाराम बापूची पुस्तकं शाळेत वाटली, संतप्त पालक..
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Jan 08, 2024 | 1:12 PM
Share

रवी खरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, उरण | 8 जानेवारी 2024 : उरणमधील एका शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बलात्काराच्या गुन्ह्यासाठी आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूचा पुळका उरणमधल्या एका शाळेला आला आहे. ‘संस्कार सरिता’ नावाचे आसाराम बापूचे पुस्तक उरण येथील ‘जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट’च्या विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. एवढंच नव्हे तर पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ते पुस्तक वाटून त्यावर परीक्षा घेण्याची तयारीही मुलांकडून करून घेण्यात येत आहे. घृणास्पद गुन्ह्याची शिक्षा भोगणाऱ्या आसाराम बापूविषयी अभ्यास करायला लावून शाळेला मुलांवर कोणते संस्कार शाळेला करायचे होते? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना आसाराम बापूचे ‘संस्कार सरिता’ पुस्तक वाटण्यात आले . या पुस्तकावर आधारि परीक्षाही घेण्यात येणार होती. त्यावर आधारित इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार होती. त्यासाठी तीन वयोगट ठरविण्यात आले होते. जो विद्यार्थी ६० टक्के प्राप्त करेल त्याची जिल्हास्तरीय निवड होणार असल्याचे सांगण्यात आले होते. आणि जिल्हास्तरीय टॉपमध्ये ६ विद्यार्थ्यांची निवड करून, प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांला २१ हजार, द्वितीय येणाऱ्यास १५ हजार, तृतीय क्रमांकास ११ हजार, चतुर्थ क्रमांकास सात हजार, पाचव्या क्रमांकास ५ हजार, सहाव्या क्रमांकास ३ हजार अशी पुरस्कारांसाठीची रक्कम ठरवलेली होती.

आम्हाला वरून आदेश आलेत..

मात्र जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट ह्या शाळेत सेमी इंग्लिशने शिकणाऱ्या इयता तिसरीच्या विद्यार्थीनीच्या पालकांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी लगोलग शाळेशी संपर्क साधला. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिकेची भेट घेऊन यावर चर्चा करण्यात आली. त्यावर ‘वरून आदेश आहेत, मी काहीही करू शकत नाही’ , असे उत्तर प्रिन्सिपल यांच्याकडून देण्यात आल्याचं पालकांनी सांगितलं.

मुख्याध्यापकांच्या या उत्तरानंतर पालकांनी निराश न होता पुन्हा शाळेच्या दादर येथील संस्थेशी संपर्क केला असता दुसऱ्या दिवशी विद्यार्थांना दिलेली पुस्तक शाळेने पुन्हा जमा करायला सांगितली. विशेष म्हणजे उरण मधील ही शाळा नामांकित शाळा असून ग्रॅज्युएशनपर्यंत मुलांना शिक्षण देते. त्याच शाळेत आसाराम बापूच्या पुस्तकांवर परीक्षा घेण्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र सध्या मुलांना देण्यात आलेली पुस्तक पुन्हा घेऊन या आणि जमा करा असे आदेश शाळेने दिले आहेत.

शाळेला कोणते संस्कार मुलांना द्यायचेत, संतप्त पालकांचा सवाल

विशेष म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापिका स्वतः एक महिला असून बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या व्यक्तीचे धडे मुलांना कसे काय द्यायला तयार झाल्या ? असाही प्रश्न संतप्त पालक विचारत आहेत. महाराष्ट्राला संत महात्म्यांचा एवढा वारसा लाभलेला असताना आसाराम बापूसारख्या बलात्काऱ्याविषयी मुलांना धडे देऊन शाळेला नेमके कोणत्या प्रकारचे संस्कार मुलांना द्यायचे होते, असे सवाल आता पालक विचारू लागलेले आहेत. ‘वरून’ जरी आदेश आलेला असला तरी मुख्याध्यापिकांनी याला विरोध का केला नाही? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडले आहेत.

तर दुसरीकडे अनेक पालकांनी शाळेतील काही शिक्षिकांकडे याविषयी विचारणा केली, तेव्हा आम्हालाही हा प्रकार योग्य वाटत नाही. आम्हीही याच्या विरोधात आहोत. पण शेवटी आम्हीही थेट विरोध करू शकत नाही. आम्हालाही शाळेत नोकरी करायची आहे, अशी हतबलता शिक्षिकांनी बोलून दाखवली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.