AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चांगली बातमी: प्रदूषण कमी करण्यासाठी औरंगाबादला पाच वर्षात मिळणार 87 कोटींचा निधी

केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे संवेदनशीलता आणि पुनरावलोकन कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यशाळेत औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांचा सहभाग होता. मुंबईत यासंदर्भातला करार करण्यात आला.

चांगली बातमी: प्रदूषण कमी करण्यासाठी औरंगाबादला पाच वर्षात मिळणार 87 कोटींचा निधी
औरंगाबादेत प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून विशेष निधी
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 24, 2021 | 5:54 PM
Share

औरंगाबाद: केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत औरंगाबादला शहरात ‘स्वच्छ वायू'(Clean Air) साठी आणि प्रदूषणावर आळा घालण्यासाठी पुढचे 5 वर्षात टप्प्या-टप्प्यात 87 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. बुधवारी मुंबई येथे यासंदर्भातील करार करण्यात आला. मुंबई येथील केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे संवेदनशीलता आणि पुनरावलोकन कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यशाळेत औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय (Astik Kumar Pandey) यांचा सहभाग होता.

मुंबईच्या कार्यशाळेत मनपा प्रशासकांचे सादरीकरण

मुंबईतील या कार्यशाळेसाठी पश्चिम भारतातील गोवा, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र चे मोठे शहरांचे मनपा आयुक्तांनी भाग घेतला. या कार्यशाळेच्या 23 नोव्हेंबरचा सत्रात आस्तिक कुमार पाण्डेय यांनी औरंगाबाद शहराने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये शहरातील वायूप्रदूषण कमी करण्यासाठी राबविण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या 350 टन क्षमता असणाऱ्या तीन प्लांट्सची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर सार्वजनिक ट्रान्सपोर्ट द्वारे सिटी बस सुरू करून शहरातील वैयक्तिक वाहनांद्वारे होणारे प्रदूषण टाळणे, सायकल ट्रॅकची निर्मिती करणे, शहरात वृक्षारोपण करणे, शहरात कारंजे बसवणे, रस्त्यावरील धूळ साफ करण्यासाठी स्वीपिंग मशीन, खाम नदी पुनरूज्जीवन, वर्टीकल गार्डन इत्यादी उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती यावेळी औरंगाबाद मनपा आयुक्तांनी दिली.

15 व्या वित्त आयोगाअंतर्गत करार

औरंगाबाद महानगरपालिकेने या कार्यशाळेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार सोबत एक करार केला आहे. या करारांतर्गत औरंगाबाद शहरात स्वच्छवायू मिळविण्यासाठी नियमबद्ध पाऊले उचलण्यात येतील. पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालय केंद्र शासन, नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन आणि औरंगाबाद महानगपालिके मध्ये 15 वा वित्त आयोग अंतर्गत हा करार आहे. या करारानुसार औरंगाबाद महानगरपालिकेला पाच वर्षांसाठी 87 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पाच वर्षात टप्प्या टप्प्यात हा निधी महानगरपालिकेला मिळेल. या कार्यशाळेसाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्री भूपेंदर यादव, महाराष्ट्र शासनचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र शासनचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

इतर बातम्या-

धक्कादायक: दोन मुलांसमोर जावयाकडून सासूवर चाकूचे वार, डोक्यात फरशी घालून खून, जालन्यात घटना

एमपी गजब है, लेडीज स्पेशल वाईन शॉप उघडणार, चार शहरात ‘ओ वुमनियाचा’ प्रयोग, वाईन फेस्टिव्हलही घेणार

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक